Shuru
Apke Nagar Ki App…
विभागीय आयुक्त झाल्यानंतर नांदेडमध्ये पहिला दौरा करण्यात आला असून, या वेळी विविध विषयांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पाऊस, कर्ज, कर्जमाफी आणि पेरणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी, बीडीओ, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे.
माधव गायकवाड
विभागीय आयुक्त झाल्यानंतर नांदेडमध्ये पहिला दौरा करण्यात आला असून, या वेळी विविध विषयांचा पूर्ण आढावा घेण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान पाऊस, कर्ज, कर्जमाफी आणि पेरणी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तलाठी, बीडीओ, तहसीलदार तसेच इतर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही बैठक घेण्यात आली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा पार पडला. या प्रसंगी शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्मिणी आणि श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पीक यावे, भरपूर पाऊस पडावा आणि सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी या वेळी केली. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. या दिंडीत चिमुकल्यांनी साकारलेली विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा सर्वांचे मुख्य आकर्षण ठरली. या सोहळ्यामुळे वाढोणा नगरीत जणू पंढरपूरच अवतरल्याचे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.1
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.1
- नांदेड येथील केंब्रिज स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी' म्हणत भव्य दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कृतीचा वारसा लाभावा आणि संस्कृतीची योग्य जाण व्हावी या हेतूने शाळेतर्फे सर्व सणांचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या दिंडीमध्ये विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले तसेच त्याद्वारे सामाजिक संदेशही देण्यात आला. अत्यंत उत्साही वातावरणात ही दिंडी पार पडली.1
- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. युवा शक्तीपुढे शेवटी मोदी सरकारला झुकावे लागले असून याच युवा शक्तीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- नांदेडच्या माहूर शहरात विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि दडपशाहीच्या निषेधार्थ गुरुवारी विविध संघटना एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला. संविधानाच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांचे हजारो लोक रस्त्यावर उतरल्याने शहरात तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. या मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले तसेच विद्यार्थ्यांवरील कथित दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला.1
- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जुलै रोजी पहाटे ४:१० वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत ४० लाख ४७ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लामजना ते तुळजापूर टी-पॉईंट मार्गे आयशर टेम्पो (TS 12 UE 4190) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी २८ लाख ९७ हजार ६० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा आणि ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा राज्यातील दोघांना ताब्यात घेतले असून मोहमद शेरु मोहमद सलीम (वय २९, रा. आट्टारी, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) आणि रहीम इस्माईल शेख (वय २६, रा. अर्श महाल, किशनबाग बहादुरा, जि. हैदराबाद, तेलंगणा) अशी त्यांची नावे आहेत. वाहनाची झडती घेतली असता त्यात सुगंधी तंबाखूची पोती आणि 'राजरत्न किमाम' नावाच्या काचेच्या डब्यांचा साठा आढळून आला. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ४२०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७५, २२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड व रामदास बाचीफळे यांच्या पथकाने पार पाडली.2