बीडकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा संपली: 'बीड–पुणे' थेट रेल्वेसेवेचा शानदार शुभारंभ! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा; विज्ञान केंद्र, तारांगण व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाचेही भूमिपूजन संपन्न विशेष प्रतिनिधी / बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्याच्या विकासात आज एक नवा ऐतिहासिक सुवर्णअध्याय लिहिला गेला. अनेक दशकांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या 'बीड–पुणे' थेट रेल्वेसेवेला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या प्रकल्पामुळे बीड आता थेट पुण्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक मार्गाशी जोडले गेले आहे. “दिलेला शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून अभिमान” – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना, पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवासाची सुविधा मिळेल असा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण होत असताना मराठवाड्याची कन्या म्हणून मला मनस्वी आनंद आणि विशेष अभिमान वाटत आहे." विकासाला गती: शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा बीड जिल्हा अनेक दशकांपासून देशाच्या रेल्वे नकाशावर नसल्याने इथल्या शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला रस्ते प्रवासातील आर्थिक भुर्दंड व त्रासाला सामोरे जावे लागत होते. या थेट रेल्वेमुळे आता: विद्यार्थी व नोकरदारांना पुणे, अहिल्यानगरसारख्या मोठ्या शैक्षणिक व औद्योगिक केंद्रांकडे प्रवास करणे अत्यंत सुलभ व किफायतशीर होईल. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या शेतीमालाला आणि स्थानिक उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती लाभेल. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान बीडच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही संपन्न झाले: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण: बीडच्या सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी नाट्यगृहाच्या अत्याधुनिक नूतनीकरणाचा शुभारंभ. विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्प: धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अत्याधुनिक सायन्स पार्क व प्लॅनेटेरियमचे भूमिपूजन. कार्यक्रमात रेल्वेसेवेच्या निमित्ताने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांमधील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीडकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा संपली: 'बीड–पुणे' थेट रेल्वेसेवेचा शानदार शुभारंभ! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा; विज्ञान केंद्र, तारांगण व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरणाचेही भूमिपूजन संपन्न विशेष प्रतिनिधी / बीड: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्याच्या विकासात आज एक नवा ऐतिहासिक सुवर्णअध्याय लिहिला गेला. अनेक दशकांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या 'बीड–पुणे' थेट रेल्वेसेवेला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून साकारलेल्या या प्रकल्पामुळे बीड आता थेट पुण्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक मार्गाशी जोडले गेले आहे. “दिलेला शब्द पूर्ण करताना मराठवाड्याची कन्या म्हणून अभिमान” – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी
१७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड–अहिल्यानगर रेल्वेसेवा सुरू करताना, पुढील वर्षी बीडकरांना थेट पुण्यापर्यंत प्रवासाची सुविधा मिळेल असा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण होत असताना मराठवाड्याची कन्या म्हणून मला मनस्वी आनंद आणि विशेष अभिमान वाटत आहे." विकासाला गती: शेतकरी, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा बीड जिल्हा अनेक दशकांपासून देशाच्या रेल्वे नकाशावर नसल्याने इथल्या शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला रस्ते प्रवासातील आर्थिक भुर्दंड व त्रासाला सामोरे जावे लागत होते. या थेट रेल्वेमुळे आता: विद्यार्थी व नोकरदारांना पुणे, अहिल्यानगरसारख्या मोठ्या शैक्षणिक व औद्योगिक केंद्रांकडे प्रवास करणे अत्यंत सुलभ व किफायतशीर होईल. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या शेतीमालाला आणि स्थानिक उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती लाभेल. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा या
ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान बीडच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही संपन्न झाले: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण: बीडच्या सांस्कृतिक चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी नाट्यगृहाच्या अत्याधुनिक नूतनीकरणाचा शुभारंभ. विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्प: धानोरा रस्त्यावरील 'पंढरी' येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी अत्याधुनिक सायन्स पार्क व प्लॅनेटेरियमचे भूमिपूजन. कार्यक्रमात रेल्वेसेवेच्या निमित्ताने आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धांमधील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- रस्त्याच्या कडेला झाडे वाढल्याने आपेगाव च्या एसटीला अनेक अडचणी1
- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च, श्री गणेश चतुर्थीच्या धर्तीवर कायदा व सुवेव्यवस्था आभाधित ठेवण्यासाठी पुन्हा सोनपेठ पोलीस प्रशासनाचा रूट मार्च संपन्न1
- नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. नांदेड रोडवर चालत्या कारवर वडाचे झाड कोसळले; चालक सुखरूप, कारचे मोठे नुकसान. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर 2026. नांदेड रोडवरील कृपासदन शाळा परिसरात बुधवार दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्यावरून जात असलेल्या एका चालत्या कारवर अचानक रस्त्याच्या कडेला असलेले जुने वडाचे झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारचालक यातून सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड रोडवरील कृपासदन परिसराकडून एक कार (क्रमांक एमएच 02 इझेड 2579) शहराच्या दिशेने जात होती. कार कृपासदन शाळेजवळ आली असता, अचानक रस्त्याच्या बाजूला असलेले एक भलेमोठे वडाचे झाड चालत्या कारच्या पुढील भागावर कोसळले. झाड पडल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. झाड थेट कारच्या बोनेटवर व टपाच्या समोरील भागावर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक विस्कळीत. मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्यामुळे नांदेड रोडवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहोचून रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले. क्रेन आणि कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जुनी झाडे हटवण्याची मागणी या परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे अत्यंत जुनी व धोकादायक झाली आहेत. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची त्वरित पाहणी करून ती हटवावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुनरावृत्त होणार नाहीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.4
- ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार; महामोर्चास परभणीत जनसागर उसळला1
- दिव्यांग व्यक्ती तपासणीची होत आहे गैरसोय.!! तपासणीसाठी उपकरणे,विशेषतज्ञ लातूरला मग तपासणी देखावे येथे कशाला?? निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग व्यक्तींची होत आहे गैरसोय..!! तपासणी टीम चे वेळ निश्चित नाही!! महिन्यातून दोन दिवस निलंगा तालुक्यातील दिव्यांगाना तपासाला यायला सुद्धा विशेषतज्ञाना वेळ नाही?1
- 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.1
- तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस तेली गल्लीत दोनदा खांदून ही लिकेज सापडेना, नगर परिषद चा अजब कारभार ! :- शेख युनूस बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील तेली गल्लीत नगर परिषद च्या भोंगळा कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पाण्याच्या लिकेजसाठी नगरपरिषद ने दोनदा रस्ता खोदला, मात्र लिकेज नेमके कुठे आहे हे सापडले नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर दररोज पाणी वाया जात आहे. तक्रार केल्यानंतर नगरपरिषद ने उशिरा दखल घेतली. आणि जेसीपी लावून रस्ता खोदला. पहिल्यांदा खोदून लिकेज सापडले नाही, म्हणून माती टाकून बुजवले. पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी खोदले गेले, तरीही लिकेज सापडले नाही. तेली गल्लीतील संपूर्ण रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि तिथे मज्जिद असल्यामुळे लोकांना घाण पाण्यातून जावे लागत आहे. गाड्यांची पाणी लोकांच्या अंगावर जात असून, शाळकरी मुळे यांना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. दोनदा खोदकाम करून सुद्धा नगरपरिषद चा पैसा आणि वेळ दोन्ही वाया गेला. हा कसला कारभार? लिकेज शोधण्यासाठी नगरपरिषद कडे एक्सपर्ट टीम नाही का? ते अंदाजे खोदकाम करून बिल काढायचे काम करत आहे का ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी केला. पुढे ते म्हणाले की, नगर परिषद ने तात्काळ तज्ञ अभियंता यांना पाठवून लिकेज शोधून काढावे व लिकेज दुरुस्ती करून खराब झालेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिककडूनही केली जात आहे.1
- आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील घाण पाण्याच्या मुद्द्यावर आंदोलन; आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर धम्मानंद वाघमारे पोलिसांच्या ताब्यात बीड | प्रतिनिधी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित पाणी सोडल्याच्या कथित घटनेप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दलित पँथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते. प्रशासनाकडून मागण्यांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर १७ सप्टेंबर रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा वाघमारे यांनी निवेदनातून दिला होता. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बीड शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूक मार्गावर नालीचे दूषित व घाण पाणी सोडण्यात आल्याचा आरोप धम्मानंद वाघमारे यांनी केला आहे. या प्रकारामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष, स्वच्छता सभापती आणि बांधकाम सभापती यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रार करून सुमारे सहा महिने उलटूनही संबंधितांवर कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी घाण पाणी सोडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी व लोकप्रतिनिधींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल करावा, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेण्यात यावेत, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे. प्रशासनाने १६ सप्टेंबरपर्यंत कारवाई न केल्यास १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी धम्मानंद वाघमारे यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. पोलिसांनी वाघमारे यांना कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे.1