शर्मा टर्निंग वर पाईपलाईन फुटली ; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय प्रशासकीय दिरंगाईचा फटका; रस्ता झाला जलमय, नागरिक त्रस्त खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शर्मा टर्निंग वर पाईपलाईन फुटली ; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय प्रशासकीय दिरंगाईचा फटका; रस्ता झाला जलमय, नागरिक त्रस्त खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- माझ्या मुलाला टार्गेट करून सस्पेंड केलं बेंडवाल यांचा आ गायकवाडांवर खळबळजनक आरोप1
- मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.10
- छत्रपती संभाजीनगरात समांतर जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया 🚨 छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेली समांतर जलवाहिनी आज ढोरकीन परिसरात अचानक फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिनी फुटल्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. महापालिका आणि संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड किंवा दाब वाढल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- politician sakarkheda Buldhana Maharashtra1
- Post by Shaha News Marathi1
- भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका1