Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्ली येथील जंतर-मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ धारूर येथे बंद पाळण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जंतर-मंतरवरील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या बंदचे आयोजन करण्यात आले होते.
Sanjhsuyog News Channel
दिल्ली येथील जंतर-मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ धारूर येथे बंद पाळण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जंतर-मंतरवरील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या बंदचे आयोजन करण्यात आले होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्ली येथील जंतर-मंतर प्रकरणाच्या निषेधार्थ धारूर येथे बंद पाळण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जंतर-मंतरवरील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी या बंदचे आयोजन करण्यात आले होते.1
- बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन काही महिने झाले आहेत, मात्र नागरिक जेव्हा आपल्या समस्या आणि प्रश्न घेऊन जातात, तेव्हा "आम्ही आत्ताच आलो, आम्हाला काहीच महिने झाले आहेत" असे उत्तर नगरसेवक देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या उत्तरामुळे जनतेचे प्रश्न नेमके कधी सुटणार, असा सवाल निर्माण झाला आहे. बीडकरांसाठी हा प्रश्न मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ यांनी पाठवला आहे.1
- नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे २० जुलै २०२६ रोजी शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी कथितपणे केलेल्या बळाच्या वापराचा निषेध करत बीड जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनात भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ), १९(१)(ब) आणि २१ अंतर्गत मिळालेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलनाचा हक्क व सन्मानाने जगण्याचा अधिकार अधोरेखित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत आंदोलकांवर अतिरिक्त किंवा बेकायदेशीर बळाचा वापर घटनाविरोधी असल्याचे बार असोसिएशनने नमूद केले आहे. या घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, दोषी पोलीस अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय व कायदेशीर मदत द्यावी, भविष्यात आंदोलनकर्त्यांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करावे, आंदोलकांशी सन्मानाने चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी बीड जिल्हा बार असोसिएशनचे सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन आणि असहकाराचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.1
- पैठण तालुक्यातील बिडकीन येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेले जाहीर शांततापूर्ण निषेध आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनाला संपूर्ण विद्यार्थीवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुरेश गायकवाड, संघर्ष अकॅडमीचे रवी सर जाधव, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊ पवार, टायगर ग्रुपचे अध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड आणि हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बप्पासाहेब पाटील आमले (रांजणगाव खुरी) उपस्थित होते. याशिवाय लोहगावचे दीपक जगधने व आंद्रेश पगारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष रवी भाऊ बोरसे, महाराष्ट्र सचिव रविंद्र भाऊ गायकवाड, गंगापूर तालुका सदस्य किशोर पवार, गंगापूरचे अजय खुरसने, बिडकीनचे सामाजिक कार्यकर्ते अजय भाऊ भिवसाने, वंचित बहुजन आघाडीचे ढोले सर आणि सामाजिक कार्यकर्ते अफसर तडवी या मान्यवरांनीही आंदोलनाला उपस्थिती लावली.2
- देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज कुंभार पिंपळगाव शहर कडकडीत बंद पाळण्यात आले. ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या 'गाव बंद'च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवले. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला असून नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. पेपरफुटीच्या तीव्र निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कुंभार पिंपळगावची संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनावरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ बीडच्या वडवणी तालुक्यात हुकूमशाही सरकारविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात वडवणी तालुक्यातील विद्यार्थी, युवक, शिक्षणप्रेमी, शेतकरी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत मोर्चेकऱ्यांनी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान "शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा", "मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी" आणि "इन्कलाब जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई व्हावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बलप्रयोग केला जाऊ नये, अशी जोरदार मागणी केली. तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या प्रसंगी उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या जनआक्रोश मोर्चात तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.1