logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मोठा पाठिंबा मिळाला आहे. घाटंजीमध्ये पीबीआय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जोरदार निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले।

15 hrs ago
user_विलास महल्ले
विलास महल्ले
Ghatanji, Yavatmal•
15 hrs ago

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मोठा पाठिंबा मिळाला आहे. घाटंजीमध्ये पीबीआय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जोरदार निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले।

More news from Yavatmal and nearby areas
  • नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मोठा पाठिंबा मिळाला आहे. घाटंजीमध्ये पीबीआय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जोरदार निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले।
    1
    नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मोठा पाठिंबा मिळाला आहे. घाटंजीमध्ये पीबीआय आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या उपोषणाला पाठिंबा दर्शवत जोरदार निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले।
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    15 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील उन्नती गृह उद्योगाच्या माध्यमातून पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया अंतर्गत शेंगदाणा लाडू तयार केले जात आहेत.
    4
    वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील उन्नती गृह उद्योगाच्या माध्यमातून पंतप्रधान अन्न सूक्ष्म प्रक्रिया अंतर्गत शेंगदाणा लाडू तयार केले जात आहेत.
    user_Archana Nikam
    Archana Nikam
    देवळी, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दडपशाहीचा मारा केला आहे. स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अशा प्रकारे दडपशाहीची कारवाई करण्यात आली आहे.
    1
    न्याय आणि हक्कासाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दडपशाहीचा मारा केला आहे. स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अशा प्रकारे दडपशाहीची कारवाई करण्यात आली आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    2 hrs ago
  • मुंब्रा येथील वाढती लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन AIMIM चे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी महासभेत स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मागणीला AIMIM चे गट नेते आणि नगरसेवक सैफ पठान यांनी जोरदार पाठिंबा दिला असून मुंब्रा येथील नागरिकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेता लवकरात लवकर स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सैफ पठान यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही मागणी थेट सामान्य जनतेच्या गरजांशी जोडलेली असून संबंधित प्रशासनाने या दिशेने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रत्येक व्यासपीठावर अत्यंत मजबुतीने मांडत राहू, अशी भूमिका AIMIM कडून व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    मुंब्रा येथील वाढती लोकसंख्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन AIMIM चे नगरसेवक शोएब डोंगरे यांनी महासभेत स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मागणीला AIMIM चे गट नेते आणि नगरसेवक सैफ पठान यांनी जोरदार पाठिंबा दिला असून मुंब्रा येथील नागरिकांच्या सोयी-सुविधा लक्षात घेता लवकरात लवकर स्लॉटर हाऊसची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे.

सैफ पठान यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही मागणी थेट सामान्य जनतेच्या गरजांशी जोडलेली असून संबंधित प्रशासनाने या दिशेने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे प्रत्येक व्यासपीठावर अत्यंत मजबुतीने मांडत राहू, अशी भूमिका AIMIM कडून व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे एकत्र येत आंदोलन केले. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून खटला जलदगतीने निकाली काढण्याची आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. नरसापूर येथील प्रकरणाच्या धर्तीवर या घटनेतील आरोपींनाही फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा अमानुष कृत्यांना आळा बसेल, अशी ठाम मागणी महिलांनी केली आहे. महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करत, अशा गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, 'निष्पाप बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे' असा आक्रमक सूर यावेळी उमटला.
    2
    वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे एका अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे एकत्र येत आंदोलन केले. महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक निवेदन सादर केले आहे.

या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून खटला जलदगतीने निकाली काढण्याची आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. नरसापूर येथील प्रकरणाच्या धर्तीवर या घटनेतील आरोपींनाही फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा अमानुष कृत्यांना आळा बसेल, अशी ठाम मागणी महिलांनी केली आहे. महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त करत, अशा गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, 'निष्पाप बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे' असा आक्रमक सूर यावेळी उमटला.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्या 'कावडे हॉस्पिटल'चे भव्य उद्घाटन होणार आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी हाडे, सांधे आणि नेत्ररोग उपचारांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे उद्या 'कावडे हॉस्पिटल'चे भव्य उद्घाटन होणार आहे. या रुग्णालयात रुग्णांसाठी हाडे, सांधे आणि नेत्ररोग उपचारांची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    6 hrs ago
  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील साखरा येथील उड्डाण पुलावर रास्त धान्य दुकानात रेशनचा माल घेऊन जाणाऱ्या ४०७ मिनीडोर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात दिनेश नारायणराव मुरतलवार (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा दिनेश मुरतलवार (वय १८, रा. दोरली, पांढरकवडा) हे गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय धान्य गोदाम पांढरकवडा येथून ४०७ मिनीडोर वाहनाने (क्र. एम.एच. १२ एफ.डी. १४४०) तालुक्यातील मंगी येथे धान्य घेऊन जात असताना साखरा उड्डाणपुलाजवळ धान्याचे एक पोते खाली रस्त्यावर पडले. चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी ते पोते उचलण्यासाठी गाडी उड्डाणपुलावरच फिरवून राँग साईडने टाकली. त्याच वेळी हैदराबादवरून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्र. आर.जे. ११ जीबी ३१२९) मिनीडोरला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली आणि ४०७ मधील लोक व ट्रकचालक आत फसले. मृतक व जखमींना बाहेर काढण्यासाठी अखेर क्रेन आणि कटरचा वापर करावा लागला. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत असल्याची माहिती २१ जुलै रोजी पोलिसांनी दिली आहे.
    1
    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील साखरा येथील उड्डाण पुलावर रास्त धान्य दुकानात रेशनचा माल घेऊन जाणाऱ्या ४०७ मिनीडोर आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात दिनेश नारायणराव मुरतलवार (वय ४७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा दिनेश मुरतलवार (वय १८, रा. दोरली, पांढरकवडा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

शासकीय धान्य गोदाम पांढरकवडा येथून ४०७ मिनीडोर वाहनाने (क्र. एम.एच. १२ एफ.डी. १४४०) तालुक्यातील मंगी येथे धान्य घेऊन जात असताना साखरा उड्डाणपुलाजवळ धान्याचे एक पोते खाली रस्त्यावर पडले. चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी ते पोते उचलण्यासाठी गाडी उड्डाणपुलावरच फिरवून राँग साईडने टाकली. त्याच वेळी हैदराबादवरून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने (क्र. आर.जे. ११ जीबी ३१२९) मिनीडोरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने एकमेकांमध्ये अडकली आणि ४०७ मधील लोक व ट्रकचालक आत फसले. मृतक व जखमींना बाहेर काढण्यासाठी अखेर क्रेन आणि कटरचा वापर करावा लागला. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करत असल्याची माहिती २१ जुलै रोजी पोलिसांनी दिली आहे.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.