पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.
पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.
- ------- पाटोदा(प्रतिनिधी):- १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बीड बसस्थानकात गंभीर अनियमितता समोर येत असून ‘अजब-गजब’ कारभाराची चर्चा रंगली आहे. भव्यदिव्य इमारतीच्या दर्शनी भागातच जिल्हा वाहतूक शाखेची खोली, झाडाला बांधलेले व थकबाकी असलेले विद्युत मीटर, तसेच पिण्याच्या पाण्याची (RO) ठप्प व्यवस्था आणि सशुल्क शौचालयातील गैरसोयींमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जिल्हा वाहतूक शाखेची छोटी खोली उभारण्यात आल्याने इमारतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुळे बसस्थानकाच्या सौंदर्यावर परिणाम होत असून प्रवाशांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होत आहे. ही शाखा तत्काळ योग्य ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरात झाडाला बांधलेल्या विद्युत मीटरमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम काळात कंत्राटदाराने घेतलेले हे मीटर आज ही उघड्यावर लटकलेल्या अवस्थेत असून त्यावर तब्बल ३७ हजार रुपयांची थकबाकी आहे. उघड्यावर पडलेले फ्युज आणि वायरिंग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. तरी ही संबंधितांवर कारवाई न झाल्याने महावितरणच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या शिवाय, प्रवाशांसाठी असलेली पिण्याच्या पाण्याची (RO) सुविधा ठप्प असून ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. सशुल्क शौचालयाची अवस्था देखील अत्यंत दयनीय असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांकडून होणारे गैरवर्तन यामुळे प्रवाशांची मानसिक कुचंबणा होत आहे. एकीकडे सर्व सुविधा सुरळीत असल्याचा दावा विभाग नियंत्रक (राज्य परिवहन, बीड) अनुजा दुसाने यांनी केला असला तरी प्रत्यक्ष स्थिती मात्र पूर्णतः विपरीत असल्याचे दिसून येते. संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप ही होत आहे. या सर्व बाबींवर तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाय योजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, बीड यांच्या कडे केली आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागरांनी केला तुफान डान्स..!1
- Post by Sachin fakirchand Pathare1
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- जालना पोलिसांचे शक्तीप्रदर्शन! डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी शहरात भव्य पथसंचलन.. संवेदनाशील भागात पोलीसांची करडी नजर; DYSP अनंत कुलकर्णी1
- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.सुरेश (आण्णा) धस हे होते तर मा.जिल्हाधिकारी बीड श्री. विवेक जॉन्सन, मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री. हरीष धार्मिक, मा.उपविभागीय अधिकारी श्रीमती वसीमा शेख तसेच मा.दत्तात्रय निलावाड तहसीलदार पाटोदा यांची प्रमुख उपस्थिती होती. “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत नागरिकांच्या महसूल विषयक विविध तक्रारी, अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून अनेक प्रकरणे तत्काळ निकाली काढली. तसेच उर्वरित प्रकरणांबाबत संबंधित विभागास आवश्यक सूचना देण्यात आल्या. नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविणे व प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता. सदर शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त व परिणामकारक ठरले.1