माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी एक व्हिडिओ अपलोड करत अजितदादांसोबतच्या ३५ हून अधिक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९८५ पासून आपली आणि अजितदादांची मैत्री होती, आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले, असे पाटील यांनी म्हटले आहे. या काळात सुख, दुःख, यश आणि अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या असून अनेक बाबींवर एकमत तर काही विषयांवर वेगवेगळे मत असले तरी चर्चेतून नेहमी एकमतावर यायचो, असे त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दरवर्षीचा रिवाज यावर्षी मोडल्याचे सांगत पाटील यांनी अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या आहेत. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील, असे त्यांनी लिहिले आहे. 'जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन' असे म्हणण्याची इच्छा होत नसून 'वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी एक व्हिडिओ अपलोड करत अजितदादांसोबतच्या ३५ हून अधिक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९८५ पासून आपली आणि अजितदादांची मैत्री होती, आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले, असे पाटील यांनी म्हटले आहे. या काळात सुख, दुःख, यश आणि अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या असून अनेक बाबींवर एकमत तर काही विषयांवर वेगवेगळे मत असले तरी चर्चेतून नेहमी एकमतावर यायचो, असे त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दरवर्षीचा रिवाज यावर्षी मोडल्याचे सांगत पाटील यांनी अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या आहेत. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील, असे त्यांनी लिहिले आहे. 'जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन' असे म्हणण्याची इच्छा होत नसून 'वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
- माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी एक व्हिडिओ अपलोड करत अजितदादांसोबतच्या ३५ हून अधिक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९८५ पासून आपली आणि अजितदादांची मैत्री होती, आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले, असे पाटील यांनी म्हटले आहे. या काळात सुख, दुःख, यश आणि अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या असून अनेक बाबींवर एकमत तर काही विषयांवर वेगवेगळे मत असले तरी चर्चेतून नेहमी एकमतावर यायचो, असे त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दरवर्षीचा रिवाज यावर्षी मोडल्याचे सांगत पाटील यांनी अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या आहेत. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील, असे त्यांनी लिहिले आहे. 'जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन' असे म्हणण्याची इच्छा होत नसून 'वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.1
- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका इन्स्टाग्राम न्यूज चॅनेल पेजवर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला जात असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल या कारवाईमुळे उपस्थित केला जात आहे.1
- वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.1
- फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.1
- दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला असून कुडाळ येथे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.1
- केंद्र सरकारच्या विरोधात आपला तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी युवकांनी रॅप गाण्याचा मार्ग अवलंबला आहे. रॅपच्या माध्यमातून युवकांनी केंद्र सरकारचे वाभडे काढत सरकारविरोधातील आपला असंतोष आणि राग उघडपणे मांडला आहे.1
- देशभरात पेपरफुटी प्रकरणांवर तीव्र चिंता व्यक्त होत असताना केंद्र सरकार याविरोधात अत्यंत कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा एका व्हिडिओ संदेशाद्वारे दिले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात आणखी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधानांनी एकाच दिवसात दुसऱ्यांदा या गंभीर विषयावर आपली भूमिका मांडली आहे. पेपरफुटी प्रकरणांमधील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.1
- आमदार जयंत पाटील यांनी फेसबुकवर व्हिडीओ अपलोड करत आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या धमकीच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज एका पोलीस कर्मचाऱ्याने शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना “ड्रग्सचं पाकीट खिशात टाकून आत टाकू” अशी धमकी दिल्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील अधिवेशनात आपण ड्रग्स माफिया आणि पोलिस यंत्रणेतील संभाव्य संगनमताचा मुद्दा उपस्थित केला होता, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली. जर असे वक्तव्य झाले असेल तर त्यामागील सत्य समोर आलेच पाहिजे, अशी मागणी करत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे धमकावणे लोकशाहीला शोभणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.1