Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला असून कुडाळ येथे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.
Mahadoot news
दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला असून कुडाळ येथे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिल्लीतील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला असून कुडाळ येथे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे.1
- माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी एक व्हिडिओ अपलोड करत अजितदादांसोबतच्या ३५ हून अधिक वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९८५ पासून आपली आणि अजितदादांची मैत्री होती, आम्ही जवळपास एकाच वेळी सार्वजनिक जीवनात आलो आणि ३५ वर्षांहून अधिक काळ एकत्र काम केले, असे पाटील यांनी म्हटले आहे. या काळात सुख, दुःख, यश आणि अपयश या सर्व भावना एकत्र अनुभवल्या असून अनेक बाबींवर एकमत तर काही विषयांवर वेगवेगळे मत असले तरी चर्चेतून नेहमी एकमतावर यायचो, असे त्यांनी नमूद केले आहे. दादांच्या वाढदिवसाला न चुकता शुभेच्छा देण्याचा दरवर्षीचा रिवाज यावर्षी मोडल्याचे सांगत पाटील यांनी अत्यंत भावूक भावना व्यक्त केल्या आहेत. ३५ वर्षांची मैत्री तोडून दादा लवकर गेले, हा माझा त्यांच्याशी वाद कायम राहील, असे त्यांनी लिहिले आहे. 'जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन' असे म्हणण्याची इच्छा होत नसून 'वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, दादा' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.1
- सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका इन्स्टाग्राम न्यूज चॅनेल पेजवर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. शासनाच्या या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला जात असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवाल या कारवाईमुळे उपस्थित केला जात आहे.1
- फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतरवर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मुलांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, दगडफेक आणि मुलींची छेडछाड असे प्रकार घडल्याच्या निषेधार्थ राज्यातील आंबेडकरी पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी २३ जुलै रोजी बंदची हाक दिली होती. या आवानाला प्रतिसाद देत ऐतिहासिक जावळीतील व्यापारी व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने जावळीत १००% बंद यशस्वी झाला. मात्र, दुसरीकडे मराठ्यांची राजधानी असलेले सातारा शहर भाजपच्या प्रभावाखाली असल्याने सर्व दुकाने सताड उघडी ठेवून बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दात विचकावून दाखवत होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे वाटोळे झाले तरी चालेल पण राज्यकर्ते जगले पाहिजेत, जणू असेच सांगत शिवरायांची राजधानी असलेला सातारा भाजपच्या प्रभावाखाली राहिल्याचे पाहायला मिळाले.1
- वाटंबरे येथील जिल्हा प्राथमिक केंद्र शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या बालदिंडी सोहळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.1
- जनतेने पोलिसांवर कसा भरवसा ठेवावा असा थेट सवाल उपस्थित करत पोलीस प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समोर आलेल्या एका व्हिडिओवरून पोलीस खात्यात कशा प्रकारे काम चालले आहे हे स्पष्ट होत असून, खरे गुंड हे पोलीस प्रशासनच असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. वर्दीमधील या गुंडांमुळेच समाजात गुंडगिरी वाढल्याचे या व्हिडिओवरून सिद्ध होत असल्याचा दावा करत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.1
- आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उत्तम उपचार मिळतील, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या शिबिरांद्वारे सर्व गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवून त्यांना योग्य ते उपचार उपलब्ध करून दिले जातील.1