जालन्यात ‘लाव्हा सदृश’ पदार्थाचा उलगडा; विद्युत गळतीमुळे वितळले खडक पहा सविस्तर व्हिडिओ... जालन्यात विद्युत गळतीमुळे वितळले खडक ! राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली. परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जालन्यात ‘लाव्हा सदृश’ पदार्थाचा उलगडा; विद्युत गळतीमुळे वितळले खडक पहा सविस्तर व्हिडिओ... जालन्यात विद्युत गळतीमुळे वितळले खडक ! राजपूत वाडीत खळबळीनंतर महावितरणचे स्पष्टीकरण; बिघाड दुरुस्त, परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या ‘लाव्हा सदृश’ पदार्थ बाहेर येण्याच्या रहस्यमय घटनेचा अखेर उलगडा झाला असून ही घटना विद्युत गळतीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाजवळील जमिनीतून गरम व चिकट पदार्थ बाहेर येताना दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहून त्याचे व्हिडिओही चित्रीत केले. तत्काळ महावितरण विभागाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या महावितरणच्या पथकाने तपास सुरू केला असता, ११ केव्ही सॅटेलाइट फीडरचा कंडक्टर खराब पिन इन्सुलेटरमुळे V-क्रॉस आर्म आणि RSJ पोलच्या संपर्कात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे विद्युतप्रवाह थेट जमिनीत गेल्याने (इलेक्ट्रोक्यूशन) तीव्र उष्णता निर्माण झाली. परिसरातील खडकाळ जमिनीमुळे या उष्णतेचा परिणाम म्हणून जमिनीतील खडक वितळून ‘लाव्हा सदृश’ स्वरूपात बाहेर येताना दिसले. त्यामुळे हा प्रकार नैसर्गिक नसून तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- राज्यात महापुरुषांच्या नावाखाली अनाधिकृत पुतळे व स्मारके उभारण्याचे प्रकार वाढत असून, त्या मुळे सामाजिक सलोखा बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शासनाच्या पुतळा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटाकर, मुबीन शेख, शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष, विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, भिमराव कुटे सह आदी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आलेल्या अशा अनाधिकृत स्मारकांमुळे समाजात तणाव निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता वाढते. त्या मुळे अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने २ मे २०१७ रोजी पुतळा धोरणासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, त्या नुसार पुतळा उभारण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. तसेच पुतळ्याचे ठिकाण वादग्रस्त नसावे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, उंची व साहित्याला तांत्रिक मान्यता असावी, तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शपथपत्र व ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच पुतळे उभारावेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी या वेळी व्यक्त केली.1
- छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये भाजपचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे विविध कार्यकर्त्यांचा सत्कार भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी भाजपचे आमदार संजय केणेकर त्याचबरोबर विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.1
- Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा। राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है। #TazaToday #IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion #BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews #TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- जालना शहरात आज मिळालेले माहिती अनुसार गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. गॅस पंप मालकांकडून दरवाढीबाबत मनमानी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत जीआर (शासन निर्णय) मागितल्यानंतरही तो देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक शहर अध्यक्ष संतोष शेळके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जालना शहरातील गॅस पंपांवर सध्या वाढीव दराने गॅस विक्री होत असल्याची माहिती समोर आली1
- Post by AapTak Hindi News Channel1
- छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारे समांतर पाईपलाईन ही ढोरकीन येथे फुटली असून लाखो लेटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याची मोठी समस्या असून त्यामध्ये समांतर पाईपलाईन फुटल्याने आता पुन्हा छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा खंडित होणार आहे.1