Shuru
Apke Nagar Ki App…
beneficiaries of the pradhan mantri ujjwala yojana receive 300
Anil Santosh Tirmale
beneficiaries of the pradhan mantri ujjwala yojana receive 300
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- रविवार ठरला मृत्यूचा वार!; हर्सूल तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू छत्रपती संभाजीनगर, दि. ५ : शहरातील हर्सूल परिसरात असलेल्या तलावात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खोल भागात गेल्यामुळे ते बुडू लागले. सोबत असलेल्या इतरांनी मदतीसाठी आरडाओरड केली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बचाव कार्य सुरू करून सर्वांना बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर चौघांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सूचना: उन्हाळ्याच्या काळात तलाव, धरण किंवा खोल पाण्यात पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.1
- येवला: येथील तालुका क्रीडा संकुलात 'मॉर्निंग बॅडमिंटन ग्रुप'च्या वतीने आयोजित भव्य बॅडमिंटन स्पर्धा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत ग्रुपच्या २८ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता, ज्यातून १४ चुरशीचे संघ मैदानात उतरले होते. गेल्या अनेक दिवसांपासून या स्पर्धांचे नियोजन सुरू होते. संकुलातील दोन्ही कोर्टवर अत्यंत खेळीमेळीच्या आणि खिलाडूवृत्तीच्या वातावरणात हे सामने रंगले. या चुरशीच्या लढतीत डॉ. सचिन शर्मा यांनी प्रथम क्रमांकाचे २१,०११ रुपये व ट्रॉफीचे मानकरी ठरले. उदयकुमार कुराडे सर यांनी द्वितीय (११,१११ रुपये), तर कुणाल पटेल व सनी शिंदे यांनी तृतीय (७,०७७ रुपये) क्रमांक सामाईकपणे पटकावला. या उपक्रमासाठी राहुल भावसार, रवी पवार, विपुल शर्मा, डॉ. सचिन शर्मा आणि सनी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या यशस्वी आयोजनाबद्दल तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून मॉर्निंग ग्रुपचे विशेष कौतुक होत आहे.1
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2