Shuru
Apke Nagar Ki App…
आयकर अधिकारी bhasaun व्यापारी kadun पैसे Gheun गेले होते त्याना अटक
चंद्रकला हेमंत वळवी
आयकर अधिकारी bhasaun व्यापारी kadun पैसे Gheun गेले होते त्याना अटक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून धुळे शहरात गो गॅसच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत. गॅस पंप चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्याचा आरोप करत रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.1
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- सोयगाव, दि. ०५ : दिंडोरीतील ताज्या दुर्घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीत एक मालवाहतूक गाडी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने संपूर्ण गाव विहिरीजवळ जमा झाले होते. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या गंभीर घटनेच्या वेळी एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनातील एकही अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याचे समोर आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे रस्त्यालगत कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छोट्या भावाने वहिनीचा विनयभंग करत असताना महिलेचा पती आरोपीचा भाऊ याला मारहाण करीत भावाने गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरला म्हणून दोन आरोपी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2