logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

1 hr ago
user_Amol jadhav
Amol jadhav
दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप ​येवला: येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत. ​एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे. ​या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. ​आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप
हक्काच्या पैशांसाठी येवल्यात ठेवीदार रस्त्यावर; पारख पतसंस्थेच्या कारभाराविरोधात तीव्र संताप
​येवला:
येवल्यातील कै. सुभाषचंद्रजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ठेवीदारांनी अखेर रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. शहर व तालुक्यातील शेकडो नागरिकांनी आपल्या कष्टाची पुंजी या पतसंस्थेत विविध मुदतींच्या ठेवींच्या रूपात गुंतवली होती. मात्र, मुदत संपूनही ठेवीदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळत नसल्याने अनेक कुटुंबे गंभीर आर्थिक संकटात सापडली आहेत.
​एकीकडे हक्काच्या पैशांसाठी सर्वसामान्य ठेवीदार वणवण भटकत असताना, दुसरीकडे पतसंस्थेचे संचालक पिंटू  पारख यांच्या वाढदिवसानिमित्त लाखो रुपयांची उधळण करत जंगी सोहळा साजरा करण्यात आला. या प्रकारामुळे ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, "सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे लाटून कसले कसले सत्कार सोहळे साजरे करता?" असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला आहे.
​या फसवणुकीविरोधात निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल आणि सोना कोतवाल यांच्यासह शेकडो ठेवीदारांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. पतसंस्थेच्या या मनमानी कारभाराची चौकशी करून ठेवीदारांचे पैसे त्वरित परत मिळवून द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
​आता या गंभीर प्रकरणी सहकार विभाग आणि पोलीस प्रशासन काय कडक पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • दरसवाडी डोंगरगाव कालव्यात पाणी दाखल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, दरसवाडी डोंगरगाव कालव्याला अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत. येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे कालव्यात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
    1
    दरसवाडी डोंगरगाव कालव्यात पाणी दाखल; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण,
दरसवाडी डोंगरगाव कालव्याला अखेर पाणी सोडण्यात आले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. या पाण्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.
येवला तालुक्याचे भाग्यविधाते आणि माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे कालव्यात पाणी दाखल होताच परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शहापूर तालुक्यातील कसारा येथे उत्साहात आदिवासी दिन साजरा शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, मिरवणूक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सजवलेल्या रथासह काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्ये, भगवे व लाल ध्वज तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती, कला, भाषा आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच शिक्षण, विकास आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या गरजेवरही यावेळी भर देण्यात आला.
    1
    शहापूर तालुक्यातील कसारा येथे उत्साहात आदिवासी दिन साजरा

शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या निमित्ताने पारंपरिक वेशभूषा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, मिरवणूक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सजवलेल्या रथासह काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्ये, भगवे व लाल ध्वज तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
आदिवासी समाजाची परंपरा, संस्कृती, कला, भाषा आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच शिक्षण, विकास आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या गरजेवरही यावेळी भर देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज दहाणू तालुक्यातील कासा-वरोती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या हस्ते, कार्याध्यक्ष सुनील लोणे व सरचिटणीस नावनाथ भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ यांच्या पुढाकारातून हे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले असून, पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला यामुळे नवी दिशा मिळणार आहे. या प्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळावा, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय बिरसा”, “जय आदिवासी”, “जय महाराष्ट्र” आणि “भूमिपुत्र एल्गार संघटना विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना अध्यक्ष प्रमोद पवार म्हणाले की, “भूमिपुत्र एल्गार संघटना ही गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी उभी राहिली आहे. ज्या दिवशी समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उरणार नाहीत, समस्या उरणार नाहीत, अन्याय आणि अत्याचार संपतील, त्या दिवशी संघटना बंद करावी लागली तरी आम्हाला आनंदच होईल. मात्र जोपर्यंत अन्याय, शोषण आणि समस्या अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भूमिपुत्र एल्गार संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढत राहील.” कार्याध्यक्ष सुनील लोणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संघटनेच्या कार्यालयात आलेला कोणताही नागरिक समाधान घेऊनच परत गेला पाहिजे. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा किंवा संघटनेचा आहे हे पाहू नका. त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहा.” या कार्यक्रमास सरचिटणीस नावनाथ भोये, राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद थुळे, जिल्हा उपाध्यक्ष विकास धोडी , जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, तलासरी तालुका अध्यक्ष अनिल करबट, सुनिता वळवी, पालघर युवा प्रमुख नयन धांगडे, विक्रमगड तालुका अध्यक्ष भाऊराम बोडके, सुधीर ब्राह्मणे , नारायण भाऊ , मनोज पारधी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर*, अतुल यादव, सुभाष कांबडी , गोपाळ भाऊ, महदू गिंभल, भाई वांगड यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यालयाच्या उद्घाटनामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वंचित, शोषित आणि भूमिपुत्र समाजाच्या न्यायहक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    3
    जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पालघर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज दहाणू तालुक्यातील कासा-वरोती येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रमोद पवार यांच्या हस्ते, कार्याध्यक्ष सुनील लोणे व सरचिटणीस नावनाथ भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ यांच्या पुढाकारातून हे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात आले असून, पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला यामुळे नवी दिशा मिळणार आहे.
या प्रसंगी आयोजित कार्यकर्ता मेळावा, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन कार्यक्रमास शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय बिरसा”, “जय आदिवासी”, “जय महाराष्ट्र” आणि “भूमिपुत्र एल्गार संघटना विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी बोलताना अध्यक्ष प्रमोद पवार म्हणाले की, “भूमिपुत्र एल्गार संघटना ही गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी उभी राहिली आहे. ज्या दिवशी समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यात अश्रू उरणार नाहीत, समस्या उरणार नाहीत, अन्याय आणि अत्याचार संपतील, त्या दिवशी संघटना बंद करावी लागली तरी आम्हाला आनंदच होईल. मात्र जोपर्यंत अन्याय, शोषण आणि समस्या अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भूमिपुत्र एल्गार संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढत राहील.”
कार्याध्यक्ष सुनील लोणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “संघटनेच्या कार्यालयात आलेला कोणताही नागरिक समाधान घेऊनच परत गेला पाहिजे. तो कोणत्या जातीचा, धर्माचा, पक्षाचा किंवा संघटनेचा आहे हे पाहू नका. त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहा.”
या कार्यक्रमास सरचिटणीस नावनाथ भोये, राज्य सरचिटणीस स्वप्नील वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मिलिंद थुळे, जिल्हा उपाध्यक्ष विकास धोडी , जिल्हा सरचिटणीस रेखा धांगडे, तलासरी तालुका अध्यक्ष अनिल करबट, सुनिता वळवी, पालघर युवा प्रमुख नयन धांगडे, विक्रमगड तालुका अध्यक्ष भाऊराम बोडके, सुधीर ब्राह्मणे , नारायण भाऊ , मनोज पारधी, प्रसाद भालेराव, मनोज धर्ममेहर*, अतुल यादव, सुभाष कांबडी , गोपाळ भाऊ, महदू गिंभल, भाई वांगड यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यालयाच्या उद्घाटनामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी, वंचित, शोषित आणि भूमिपुत्र समाजाच्या न्यायहक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
    user_सचिन पाटील
    सचिन पाटील
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    1
    लाडकी बहीण'संदर्भात महत्त्वाची बातमी 'ई-केवायसीसाठी सहा महिन्याची मुदत दिलेली'
    user_Sandip Rathod
    Sandip Rathod
    चाळीसगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा...... धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.
    1
    धुळ्यात महिला बचत गटाची फसवणूक; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा......
धुळे: महिला बचत गटाची फसवणूक करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी ची चौकशी करून कार्यवाही करा. आज पासून आंदोलने सुरू केले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं! नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :- 📌 ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे. 📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे. 📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे. या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
    1
    जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे सरळमार्गे व्हावी, हा आपला हक्क आहे. या हक्कासाठी मैदानात उतरून लढणाऱ्या, आजच्या चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो. काल रात्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला, आताही सिन्नर येथे आंदोलनस्थळी असताना मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी फोन केला असता आपण 3 प्रमुख मागण्या लावून धरल्या :-
📌  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता 60 दिवसांत अंतिम अहवाल आला पाहिजे.
📌 समितीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता, फक्त नफा तोट्याचे गणित न मांडता जनभावनेचा विचार केला पाहिजे.
📌 समितीने तालुक्या-तालुक्यात आणि गावागावात येऊन, जनसुनवाई / ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घेतली पाहिजे.
या तीनही मागण्या आम्हाला प्रशासनाकडून लेखी हव्यात, अशी ठाम भूमिका आपण यावेळी घेतली आहे. यावर मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाही तर जनभावना सरकारपर्यंत पोहोचावी, यासाठी आहे. 
पण, "जब तक रेल दौडेगी नहीं, तब तक लडाई रुकेगी नहीं!" हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • डोळखांब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा लोकनेते दयानंद चोरघे यांची विशेष उपस्थिती शहापूर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून डोळखांब येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत समस्त आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डोळखांब येथे दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आदिवासी समाजातील कार्यकर्ते तानाजी भगत, बुधाजी मधे, हिरामण खोडका, लक्ष्मण गांगड, किसन शिवारी, आंबो खांडवी, बुधा दुपारी, सखुबाई वाघ, सोमा केव्हारी, तुकाराम खडके आणि श्रावण बरतड यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचा संदेश देत संपूर्ण डोळखांब शहरातून भव्य मिरवणूक काढली. चिंचवाडी येथील वाद्य पथकाने आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवत मिरवणुकीत तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम अधिक दर्जेदार पद्धतीने आयोजित करण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी समाजाचे नेते दि. ना. उघडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू डोहळे, समाजसेवक शिवाजी देशमुख, विकास चौधरी, सागर देशमुख, भास्कर भोईर, दिनेश कांबळे, हरिभाऊ शिंदे, गंगाराम झुगरे, सुनील वारघडे, बणेश लोखंडे, सिकंदर शेख, पंढरीनाथ ठाकरे, दत्तू झुगरे, सखाराम गांगड, विश्वनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
    1
    डोळखांब येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
लोकनेते दयानंद चोरघे यांची विशेष उपस्थिती

शहापूर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून डोळखांब येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत समस्त आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डोळखांब येथे दरवर्षी जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी आदिवासी समाजातील कार्यकर्ते तानाजी भगत, बुधाजी मधे, हिरामण खोडका, लक्ष्मण गांगड, किसन शिवारी, आंबो खांडवी, बुधा दुपारी, सखुबाई वाघ, सोमा केव्हारी, तुकाराम खडके आणि श्रावण बरतड यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचा संदेश देत संपूर्ण डोळखांब शहरातून भव्य मिरवणूक काढली. चिंचवाडी येथील वाद्य पथकाने आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
लोकनेते तथा डी. वाय. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवत मिरवणुकीत तसेच जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम अधिक दर्जेदार पद्धतीने आयोजित करण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आदिवासी समाजाचे नेते दि. ना. उघडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू डोहळे, समाजसेवक शिवाजी देशमुख, विकास चौधरी, सागर देशमुख, भास्कर भोईर, दिनेश कांबळे, हरिभाऊ शिंदे, गंगाराम झुगरे, सुनील वारघडे, बणेश लोखंडे, सिकंदर शेख, पंढरीनाथ ठाकरे, दत्तू झुगरे, सखाराम गांगड, विश्वनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नमस्कार मी सचिन ज्ञानेश्वर शेंडगे राहणार कोनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी काल तुराडे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे गाडी घेऊन गेलो असताना तुराडे गावातून मी भिवंडीच्या दिशेने येत असताना हवालदार संजय जाधव साहेब आणि सूर्यवंशी यांनी माझी गाडी तुराडे कोण या दोन्ही रस्त्याच्या मध्ये अडवली व मला लायसनची मागणी केली मी त्यांना लायसन दिले असता त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तू फोनवरती बोलत होता तुझं लायसन मी जमा करणार आहे मी त्यांना विनवणी केली तरी त्यांनी ऐकले नाही दोन हजार रुपयांचा फाईन मारला त्यानंतर मी साहेबांना म्हणालो की साहेब माझं लायसन द्या त्यानंतर दोघांनी ऐकता मला मारहाण केली त्याचे चित्रीकरण मी केले असताना मला दोघांनी पोलीस चौकीमध्ये नेले पोलीस चौकीमध्ये नेऊन सूर्यवंशी साहेब यांनी माझ्या मोबाईल हिसकून माझ्या मोबाईल मधील माझ्यावर झालेल्या अन्यायाचे व्हिडिओ डिलीट केल्या व माझ्या महत्वाच्या कामाच्या जुन्या व्हिडिओ डिलीट केल्या जाकी गाडीमध्ये भरलेला म** व त्याच्या पावत्या फोटो व्हिडिओमध्ये होत्या या दोघांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी
    2
    नमस्कार मी सचिन ज्ञानेश्वर शेंडगे राहणार कोनगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे मी काल तुराडे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे गाडी घेऊन गेलो असताना तुराडे गावातून मी भिवंडीच्या दिशेने येत असताना हवालदार संजय जाधव साहेब आणि सूर्यवंशी यांनी माझी गाडी तुराडे कोण या दोन्ही रस्त्याच्या मध्ये अडवली व मला लायसनची मागणी केली मी त्यांना लायसन दिले असता त्यानंतर त्यांनी मला सांगितले की तू फोनवरती बोलत होता तुझं लायसन मी जमा करणार आहे मी त्यांना विनवणी केली तरी त्यांनी ऐकले नाही दोन हजार रुपयांचा फाईन मारला त्यानंतर मी साहेबांना म्हणालो की साहेब माझं लायसन द्या त्यानंतर दोघांनी ऐकता मला मारहाण केली त्याचे चित्रीकरण मी केले असताना मला दोघांनी पोलीस चौकीमध्ये नेले पोलीस चौकीमध्ये नेऊन सूर्यवंशी साहेब यांनी माझ्या मोबाईल हिसकून माझ्या मोबाईल मधील माझ्यावर झालेल्या अन्यायाचे व्हिडिओ डिलीट केल्या व माझ्या महत्वाच्या कामाच्या जुन्या व्हिडिओ डिलीट केल्या जाकी गाडीमध्ये भरलेला म** व त्याच्या पावत्या फोटो व्हिडिओमध्ये होत्या या दोघांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी
    user_सचिन शेंडगे 1010
    सचिन शेंडगे 1010
    Social worker कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.