*बुलढाणा: बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक.* माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.
*बुलढाणा: बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक.* माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.
- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.1
- प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- खामगांव वाडी येथे मोठी दुर्घटना 3 कमर्शियल सिलेंडर फुटून आर्या हॉटेल मध्ये लागली भिषण आग दोन वेक्ती गंभीर जखमी कोणतीही जिवीत हानी नाही1
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- पत्रकार स्वर्गीय दीपक उत्तमराव सोळंकी यांच्या शोकसभेत सर्वच झाले भावुक1
- खुलताबादमध्ये धक्कादायक घटना : सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार, पतीने दिली पूर्ण साथ; सासरा अटकेत, पती फरार खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर), १८ एप्रिल २०२६ : माणुसकीला काळिमा फासणारा एक संतापजनक प्रकार खुलताबाद शहरात उघडकीस आला आहे. २३ वर्षीय एका विवाहित युवतीवर तिच्या सासऱ्याने गेल्या वर्षभरापासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यात पीडितेच्या पतीनेही आपल्या वडिलांना पूर्ण पाठिंबा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनाक्रम काय? पीडितेने १४ एप्रिल २०२६ रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरच्या घरी राहत होती. सासरा (नाव : कलीम) पती नाईट ड्युटीवर गेल्यावर वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने प्रथम सासूला ही बाब सांगितली, मात्र सासूने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पतीला सांगितल्यावर तो म्हणाला, “वडील तुझी काळजी घेत आहेत, त्यात काय झाले?” असा अतिशय संवेदनशून्य प्रतिसाद दिला. नंतर पती दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी घर सोडून गेला. या काळात पीडितेने एक मुलीला जन्म दिला. सामाजिक भय आणि कुटुंबातील दबावामुळे तिने दीर्घकाळ सहन केले. अखेर १५ दिवसांपूर्वी माहेरी गेल्यानंतर तिने आई-भावाला सर्व घटना सांगितल्या आणि पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाई खुलताबाद पोलिसांनी सासऱ्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पतीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सासूविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (अनैतिक हेतूने आक्रमण), ५०६ (धमकी) आणि इतर कलमांसह POCSO व संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. समाजातील प्रतिक्रिया ही घटना समजल्यानंतर खुलताबादसह संपूर्ण मराठवाड्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे. पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे : “आमच्या मुलीला वर्षभर नरक भोगावा लागला. आता पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देतो.” अशा घटना समाजातील नैतिक घसरगळ दर्शवतात. महिला सुरक्षा, कुटुंबातील मूल्ये आणि कायद्याची अंमलबजावणी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अधिक अपडेटसाठी : खुलताबाद पोलिस ठाणे किंवा छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधा. न्याय मिळेपर्यंत... आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे! (ही बातमी उपलब्ध वृत्तांकन आणि पीडितेच्या तक्रारीवर आधारित आहे. तपास सुरू असल्याने अधिक माहिती उपलब्ध होत राहील.)1
- उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.1
- वरवंट बकालमध्ये महिला कंडक्टरची अरेरावी; प्रवाशांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल*.1