29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.... भंडारा :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.... भंडारा :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
- 29 ते 31 जुलैदरम्यान भंडारा जिल्ह्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा....नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.... भंडारा :- बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट भागात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड व पालघरमध्ये 30 व 31 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.1
- वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है। वैनगंगा नदी का जलस्तर बढ़ने की आशंका, प्रशासन ने जारी की सतर्कता भंडारा, 28 जुलाई 2026। वैनगंगा नदी का जलस्तर सोमवार दोपहर 243.90 मीटर दर्ज किया गया, जो खतरे के निशान से लगभग 1.5 मीटर नीचे है। गोंदिया जिले के धापेवाड़ा क्षेत्र से 200 क्यूमिक्स पानी छोड़े जाने के कारण नदी का जलस्तर बढ़ने की संभावना जताई जा रही है।1
- साकोलीत मंदिराच्या परिसरात साहित्याची चोरी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल1
- कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत1
- प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर ग्रामीणच्या वतीने विद्यार्थी पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने विद्यानिकेत इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रस्ता सुरक्षा परिवहन निरीक्षक किरण डोंगरे सहाय्यक परिवहन निरीक्षक कबीर हिवराळ यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.1
- भंडारा जिल्ह्यात सहा महिन्यात सहा टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई.... गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांत धास्ती... bhandara :- १० वर्षाचा कालावधी बघता मोक्का अंतर्गत १० कारवाई करण्यात आल्या. यामध्ये यावर्षीच्या ६ महिन्यांत ६ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये खून,खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, मोटारवाहन चोरी, अंमली पदार्थ तस्करी, अपहरण, खंडनी, दहशत निर्माण करणाऱ्या गणेशपूर टोळी, चंगू- मंगू टोळी, सम्राट टोळी, नंदनवन टोळी, महिलांगे टोळी, टप्पा मोहल्ला टोळी आदींचा समावेश आहे. पुढेही अशा प्रकारच्या कारवाई केले जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.1
- ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: १. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. 'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.1