logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही परिसरात स्थिती, शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरात उन्हाळी भातासोबतच मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. रात्रंदिवस घाम गाळून शेतकऱ्यांनी पीक उभे केले असून आता कुठे कापणीचे दिवस जवळ आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांनी मका पिकाची मोठी नासाडी सुरू केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसान भरपाईची मागणी वन्यजीवांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. रोगराई आणि नैसर्गिक संकटातून वाचवलेले पीक आता वन्यप्राणी नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे पिकांवरील रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे उभ्या मका पिकाची ऐशीतैशी झाली आहे. मक्याचे पीक पूर्णतः परिपक्व झाले असून काढणीला आले असतानाच रानडुकरांनी शेतात शिरून पिकाचे प्रचंड नुकसान केले. यामुळे राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. किन्ही (मोखे) येथील शेतकरी देवाजी रतीराम शिरसागर यांच्या शेतातील मका पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले.

2 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
2 hrs ago

मका पिकात रानडुकरांचा धुमाकूळ किन्ही परिसरात स्थिती, शेतकऱ्यांना होतोय मनःस्ताप साकोली तालुक्यातील किन्ही मोखे परिसरात उन्हाळी भातासोबतच मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. रात्रंदिवस घाम गाळून शेतकऱ्यांनी पीक उभे केले असून आता कुठे कापणीचे दिवस जवळ आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांनी मका पिकाची मोठी नासाडी सुरू केल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. नुकसान भरपाईची मागणी वन्यजीवांच्या हैदोसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून वनविभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. रोगराई आणि नैसर्गिक संकटातून वाचवलेले पीक आता वन्यप्राणी नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे पिकांवरील रोगराई आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. त्यातच आता वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे उभ्या मका पिकाची ऐशीतैशी झाली आहे. मक्याचे पीक पूर्णतः परिपक्व झाले असून काढणीला आले असतानाच रानडुकरांनी शेतात शिरून पिकाचे प्रचंड नुकसान केले. यामुळे राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. किन्ही (मोखे) येथील शेतकरी देवाजी रतीराम शिरसागर यांच्या शेतातील मका पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली सडक अर्जुनी, तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान अवैध वाळू उत्खननाच्या 36 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ₹5,87,565 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. तसेच अवैध माती व मुरूम उत्खननाच्या 9 प्रकरणांवर कारवाई करत ₹2,65,235 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमधून प्रशासनाने एकूण ₹8,52,800 इतकी दंडवसुली केली असून अवैध उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांनी सांगितले की, अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून महसूलाचे नुकसानही होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतत दक्ष असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार आहेत. या प्रभावी कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही अवैध उत्खननाची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आनंद जाधव यांनी केला आहे.
    2
    अवैध उत्खननाविरोधात सडक अर्जुनी महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई : 8.52 लाखांची दंडवसुली
सडक अर्जुनी,
तहसील कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान अवैध वाळू उत्खननाच्या 36 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ₹5,87,565 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे. तसेच अवैध माती व मुरूम उत्खननाच्या 9 प्रकरणांवर कारवाई करत ₹2,65,235 इतकी दंडवसुली करण्यात आली आहे.
या सर्व कारवायांमधून प्रशासनाने एकूण ₹8,52,800 इतकी दंडवसुली केली असून अवैध उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
तहसीलदार आनंद जाधव यांनी सांगितले की, अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून महसूलाचे नुकसानही होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतत दक्ष असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार आहेत.
या प्रभावी कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून महसूल प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनीही अवैध उत्खननाची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आनंद जाधव यांनी केला आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    Sadak-Arjuni, Gondia•
    9 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये वाढली मिरचीची आवक वाढली ०मिरची बाजार यामुळे नक्षी रोडवर भरणार भिवापूर ( राजेश जांभुळे ) यावर्षी हिरव्या मिरचीचा तोडा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात बांधावरच केला होता. त्यामुळे आठवडी मिरची मार्केट मध्ये फरवरी व मार्च, महिन्यात मिरचीची आवक कमी होती मात्र दर चांगलेच वाढलेले होते. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मिरचीच्या आठवडी बाजारात या मिरचीची 1000 क्विंटल इतकी आवक झाली. या मिरचीला 150 ते 250 रुपये किलोमागे भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मागील दोन आठवडी बाजार पासून भिवापूर मिरचीचा बाजार नक्षी रोडवरील बाजार समितीची जागा असलेल्या परिसरात नेण्यात आला. कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात मोठया प्रमाणात कापसाची आवक झाल्यामुळे हा कापसाचा साठा परिसरात ठेवलेला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव रामकृष्ण गोंगल यांनी दिली. हा परिसर भव्य तीन एकराचा असून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. 17 एप्रिलला भरलेल्या मिरचीच्या आठवडी बाजारात 1000 क्विंटल मिरचीची आवक झाली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही ओल्या डोडाचे वाळवण करून ही मिरची मोठया प्रमाणात शुक्रवारी मिरची बाजारात आणली होती चिल्लर मध्ये घरगुती वापरासाठी असलेली रोशनी व सी -5 मिरचीची किलोमागे दर 240 ते 260 इतका होता. या मिरचीला चांगली मागणी दिसून येत होती. एकंदरीत या मिरचीची दर्जा चांगला होता. सचिव रामकृष्ण गोंगल कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर मागील दोन आठवड्या पासून मिरचीचा बाजार नक्षी रोड परिसरात नेण्यात आला आहे. या परिसरात संरक्षण भिंत तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्या करीता पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून बैला करीता पाण्याचे हौद तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये वाढली मिरचीची आवक वाढली
०मिरची बाजार यामुळे नक्षी रोडवर भरणार 
भिवापूर ( राजेश जांभुळे )
यावर्षी हिरव्या मिरचीचा तोडा  शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात  बांधावरच केला होता. त्यामुळे आठवडी मिरची मार्केट मध्ये फरवरी व मार्च, महिन्यात मिरचीची आवक कमी होती मात्र दर चांगलेच वाढलेले होते. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मिरचीच्या आठवडी बाजारात या मिरचीची 1000 क्विंटल इतकी आवक झाली. या मिरचीला 150 ते 250 रुपये किलोमागे भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील दोन आठवडी बाजार पासून भिवापूर मिरचीचा बाजार नक्षी रोडवरील बाजार समितीची जागा असलेल्या परिसरात नेण्यात आला. कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात मोठया प्रमाणात कापसाची आवक झाल्यामुळे हा कापसाचा साठा परिसरात ठेवलेला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव रामकृष्ण गोंगल यांनी दिली.
हा परिसर भव्य तीन एकराचा असून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. 17 एप्रिलला भरलेल्या मिरचीच्या आठवडी बाजारात 1000 क्विंटल मिरचीची आवक झाली. तालुक्यातील  शेतकऱ्यांनी काही ओल्या डोडाचे वाळवण करून ही मिरची मोठया प्रमाणात शुक्रवारी मिरची बाजारात आणली होती चिल्लर मध्ये घरगुती वापरासाठी असलेली रोशनी व सी -5 मिरचीची किलोमागे दर 240  ते 260 इतका होता. या मिरचीला चांगली मागणी दिसून येत होती. एकंदरीत या मिरचीची दर्जा चांगला होता.
सचिव 
रामकृष्ण गोंगल
कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर
मागील दोन आठवड्या पासून मिरचीचा बाजार नक्षी रोड परिसरात नेण्यात आला आहे. या परिसरात संरक्षण भिंत तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्या करीता पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून बैला करीता पाण्याचे हौद तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    6 hrs ago
  • कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत! “कामठी पुन्हा हादरलंय…! मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना, त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला. सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला… काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला… आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत तरुणावर थेट छातीवर वार केला! या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ… सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”
    2
    कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत!
“कामठी पुन्हा हादरलंय…! 
मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना,
त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला.
सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला…
काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला…
आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत
तरुणावर थेट छातीवर वार केला!
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून,
त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत
आरोपीला अटक केली आहे.
IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास सुरू आहे.
“कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ…
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.