Shuru
Apke Nagar Ki App…
धुले सोलर कंपनीत केबल चोरी 5 जनावर गुना दाखल साक्री तालुक्यातील भड़गांव येथिल घटना
चंद्रकला हेमंत वळवी
धुले सोलर कंपनीत केबल चोरी 5 जनावर गुना दाखल साक्री तालुक्यातील भड़गांव येथिल घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- नाशिक : शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आडगाव येथील महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. १ जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जागेवर राहणाऱ्यांना कायदेशीर मालकीचा पुरावा मिळणार आहे. या कार्डमुळे कर्ज, शासकीय योजना व नोंदणी प्रक्रिया सुलभ होणार आहे. ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पनेमुळे नागरिकांना जिल्ह्यात कुठेही मालमत्ता नोंदणीची सुविधा मिळणार आहे.1
- येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- दिंडोरीत भीषण अपघात: उघड्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू; प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह 🗞️ सविस्तर बातमी: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका येथे शिवाजीनगर (इंदोरे भाग) परिसरात शुक्रवारी रात्री (३ एप्रिल २०२६) सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. सुनील दरगोडे यांच्या कुटुंबातील एकूण ९ जण कारने (MH15 JS 1053) स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत कार कोसळली. रात्रीचा अंधार आणि विहिरीभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने चालकाला विहीर दिसली नाही आणि हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ६ लहान शालेय मुले, २ महिला आणि १ चालक अशा सर्व ९ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन राबवले. घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताला “अधिकाऱ्यांची मोठी चूक” ठरवत संताप व्यक्त केला. “रस्त्याच्या मध्यभागी विहीर कशी असू शकते?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी अपघाताला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आणि रस्ता सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी विहिरीचे मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर प्रशासनाने विहिरीभोवती तातडीने बॅरिकेडिंग केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षेबाबत आणि उघड्या विहिरींसारख्या धोकादायक ठिकाणांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2