Shuru
Apke Nagar Ki App…
बरेली जवळ इनोव्हा व बाईक भीषण अपघात उत्तर प्रदेशातील घटना
चंद्रकला हेमंत वळवी
बरेली जवळ इनोव्हा व बाईक भीषण अपघात उत्तर प्रदेशातील घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- होळी आणि गुढीपाडवा या हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या तब्बल ४० वर्षांपासून मुस्लिम कारागीर हिंदू सणांसाठी ‘हार कंगन’ तयार करत आहेत. रमजानचे रोजे सुरू असतानाही मुस्लिम बांधव या पारंपरिक गोड पदार्थाच्या निर्मितीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.1
- 🏛️✅🙏💯परिवहन विभागाने निर्णय घेतल्याने दिसून येत आहेत🏛️✅🙏💯1
- येवल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपाकडून अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती येवला (प्रतिनिधी): थोर क्रांतिकारक, प्रखर हिंदुत्ववादी आणि महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला येथील जबरेश्वर खुंट भागात भारतीय जनता पार्टी, येवला शहराच्या वतीने त्यांना नम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपाचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व रमाकांत मामा भावसार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गौरवण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी व राजू परदेशी यांनी सावरकरांच्या त्यागाचा आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सोसलेल्या मरणयातना आणि त्यांचे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभिवादन कार्यक्रमास भाजप जिल्हा युवा अध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया, नाना लहरे, गोविंद तुशेरे, धीरज परदेशी, मनोज दिवटे, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, आनकाईकर, बंटी धशे, बोरगावकर साहेब, गणेश दोडे, मुकेश भावसार यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावरकरांच्या जयघोषाने करण्यात आली. प्रतिनिधी सचिन वखारे येवला4
- नाशिक:लहान मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत, ही वाढती सवय चिंताजनक असल्याचे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये पालक व शाळांच्या पुढाकारातून संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची ‘मोबाईलमुक्त वेळ’ योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये अभ्यासाची सवय वाढत असून कुटुंबीयांमध्ये संवादही सुधारल्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.1
- Raver : कृषी विभागाच्या भरारी पथकाने काल रावेरमध्ये अचानक छापा टाकून गुजरात मधून आलेल्या विना परवाना व निकृष्ट बनावट रासायनिक खतांच्या साठ्यावर कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे अधिकारी पद्मनाभ म्हस्के, विकास बोरसे, ललित इंगळे यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. बोगस खताच्या एकूण 28 बॅग्स जप्त करण्यात आल्या आहेत . जप्त खतांच्या बॅग्सचा भरारी पथकाने पंचनामा केला असून २ कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. #crimenews #krushivibhag #farmer #gujrat #maharastra #breakingnews1
- सिल्लोड तालुक्यातील अंभई घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2