कचरा गाडीच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ! बारापुल्ला गेटजवळ भीषण अपघात; कचरा गाडीच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ! बारापुल्ला गेटजवळ भीषण अपघात.. छत्रपती संभाजीनगर शहरातील बारापुल्ला गेट परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील रहिवासी तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयात शिक्षण घेणारा ओमकार खनसे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॉलेजकडे जात असताना बारापुल्ला गेटजवळ कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओमकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. तसेच संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सरस्वती भुवन महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून, ओमकारच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
कचरा गाडीच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ! बारापुल्ला गेटजवळ भीषण अपघात; कचरा गाडीच्या धडकेत विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू ! बारापुल्ला गेटजवळ भीषण अपघात.. छत्रपती संभाजीनगर शहरातील बारापुल्ला गेट परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुण विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर येथील रहिवासी तसेच सरस्वती भुवन महाविद्यालयात शिक्षण घेणारा ओमकार खनसे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे कॉलेजकडे जात असताना बारापुल्ला गेटजवळ कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओमकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. तसेच संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सरस्वती भुवन महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून, ओमकारच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
- जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.1
- समृद्धी महा मार्गावर भीषण अपघातात जालना 6 मजूर महिलांचा मृत्यू, जालन्यातील कडवंची शिवारात घडली घटना1
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली1
- समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.5
- मंठा शहरातील श्रीराम मंदिरामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्ती मे वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती नगर येथील श्रीराम मंदिरात नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैजनाथ नाना बोराडे यांनी महापूजा व महाआरती केली.1
- घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे3
- महाराष्ट्र (कोल्हापुर, जालना) के कुछ हिस्सों में पेट्रोल पंपों पर भीड़ और ईंधन संकट की अफवाहों के बीच प्रशासन ने 200 रुपये का पेट्रोल और 2000 रुपये का डीजल (टू-व्हीलर/फोर-व्हीलर के लिए) प्रति व्यक्ति सीमा तय कर दी है। यह फैसला पैनिक बाइंग को रोकने के लिए लिया गया है।1
- जालना - समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : ७ महिला मजूर ठार, ४ गंभीर जखमी !उभ्या असलेल्या पिकअपला ट्रॅकची धडक.. समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी अत्यंत भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिल्याने ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गवत काढण्याच्या कामासाठी आलेल्या महिला मजुरांना घेण्यासाठी पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पूर्ण चक्काचूर झाला असून मृत महिलांचे मृतदेह रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला दिसत होता, तसेच महिलांचे जेवणाचे डबे, चपला व इतर साहित्य विखुरलेले आढळले. मृत महिलांची नावे पुढीलप्रमाणे : १) अल्काबाई दादाराव आदमाने (निधोना) २) लक्ष्मीबाई संतोष मदन (केळीगव्हाण) ३) मिना परमेश्वर आदमाने (निधोना) ४) कांचनबाई प्रकाश आदमाने (निधोना) ५) ताराबाई गहेनाजी चौधरी (केळीगव्हाण) ६) कडुबाई रामदास मदन (केळीगव्हाण) ७) सुमनबाई कचरू आदमाने (निधोना) मृत महिला या जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण व परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमी महिलांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.1