“एसीबीच्या सावटाखालील अधिकाऱ्याला पुन्हा मंठ्याची ‘लॉटरी’? मनसेचा तहसीलदारांवर स्फोटक हल्लाबोल!” प्रतिनिधी मंठा मंठा तहसील कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसह संपूर्ण कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत प्रशासनालाच थेट आव्हान दिले आहे. “कोणताही विषय मार्गी लागल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही,” असा इशारा देत प्रकाश सोळंके यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे ई-मेल व जॉब रजिस्ट्रीद्वारे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनानंतर मंठा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनसेच्या निवेदनात गंभीर आरोपांचा भडिमार करण्यात आला आहे. एसीबी कारवाईचा उल्लेख, यवतमाळ येथून अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा जालना जिल्ह्यात “विशेष बाब” म्हणून पुनरागमन, बदली नियमांचे कथित उल्लंघन, तसेच वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथील तक्रारींचा उल्लेख करत संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच पूर्णा नदी पात्रातील वाळू घाट, अवैध वाळू वाहतूक आणि कोट्यवधींच्या व्यवहारांबाबत स्थानिक पातळीवर गंभीर चर्चा सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा करत त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. “तहसीलदार पदावर वारंवार वाद आणि तक्रारी असतील तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास उडतो,” असा थेट आरोप मनसेने केला आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रकाश सोळंके यांनी दिल्याने आता मंठा तहसील प्रकरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
“एसीबीच्या सावटाखालील अधिकाऱ्याला पुन्हा मंठ्याची ‘लॉटरी’? मनसेचा तहसीलदारांवर स्फोटक हल्लाबोल!” प्रतिनिधी मंठा मंठा तहसील कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी तहसीलदार सौ. सुमन उद्धव मोरे यांच्या तात्काळ बदलीसह संपूर्ण कार्यकाळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत प्रशासनालाच थेट आव्हान दिले आहे. “कोणताही विषय मार्गी लागल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही,” असा इशारा देत प्रकाश सोळंके यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे ई-मेल व जॉब रजिस्ट्रीद्वारे सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनानंतर मंठा तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनसेच्या निवेदनात गंभीर आरोपांचा भडिमार करण्यात आला आहे. एसीबी कारवाईचा उल्लेख, यवतमाळ येथून अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा जालना जिल्ह्यात “विशेष बाब” म्हणून पुनरागमन, बदली नियमांचे कथित उल्लंघन, तसेच वैजापूर, जाफ्राबाद आणि बदनापूर येथील तक्रारींचा उल्लेख करत संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच पूर्णा नदी पात्रातील वाळू घाट, अवैध वाळू वाहतूक आणि कोट्यवधींच्या व्यवहारांबाबत स्थानिक पातळीवर गंभीर चर्चा सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा करत त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. “तहसीलदार पदावर वारंवार वाद आणि तक्रारी असतील तर प्रशासनावरील जनतेचा विश्वास उडतो,” असा थेट आरोप मनसेने केला आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रकाश सोळंके यांनी दिल्याने आता मंठा तहसील प्रकरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने वारकरी संप्रदायातील संतांवर कथित 'प्रतिगामी विचारांच्या घुसखोरी'चा आरोप केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे वारकरी संघटना आणि हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राज्यभर निषेध आंदोलने केली आहेत. आंदोलकांनी प्रवक्त्याची जाहीर माफी आणि तात्काळ अटकेची मागणी केली असून, प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.1
- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक डिझेल टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून, कॅन-बाटल्या घेऊन डिझेल जमा करण्यासाठी घटनास्थळी गर्दी केली.1
- हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव येथील योगेश बार्शी या तरुण मेंढपाळाचा पूर्णा परिसरात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गरीब कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. धनगर समाज युवा मल्हार सेनेने कुटुंबीयांची भेट घेऊन तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली.1
- येवला/येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप येवला उपजिल्हा रुग्णालयात बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किट वाटप1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- बुलडाणा जिल्ह्यातील धरणगावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ५३ वर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली.1
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1