logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विना परवानगी तसेच आरक्षित जमिनीवर अवैध्य रित्या भूखंड पाडून विक्री केल्या ; अब्दुल रफीक माजी शिक्षण सभापती मनपा

7 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
7 hrs ago

विना परवानगी तसेच आरक्षित जमिनीवर अवैध्य रित्या भूखंड पाडून विक्री केल्या ; अब्दुल रफीक माजी शिक्षण सभापती मनपा

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Santosh Dhakulkar
    2
    Post by Santosh Dhakulkar
    user_Santosh Dhakulkar
    Santosh Dhakulkar
    कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • अकोला: अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अंधाराचे साम्राज्य महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
    1
    अकोला:
अकोला जिल्ह्यात रविवारी निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळाले. दिवसभर जिल्हा ४५ अंश सेल्सिअस तापमानाने होरपळून निघालेला असतानाच, सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. या अचानक आलेल्या संकटामुळे जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा होता, मात्र सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि वादळाने जिल्ह्याला झोडपले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातही अनेक जुने वृक्ष मुळासकट उखडून पडले आहेत. यामुळे काही मार्गांवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
अंधाराचे साम्राज्य
महावितरणच्या पायाभूत सुविधांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्यामुळे  जिल्ह्याचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी तुटलेल्या वीज तारांपासून लांब राहावे आणि सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Ashish ingle
    1
    Post by Ashish ingle
    user_Ashish ingle
    Ashish ingle
    Ice cream shop Barshitakli, Akola•
    21 hrs ago
  • ডায়মন্ড প্লাজা মাল উল্টো দিকে ড্রেনের কাজ চলছে
    1
    ডায়মন্ড প্লাজা মাল উল্টো দিকে ড্রেনের কাজ চলছে
    user_ASIQUE AHAMED
    ASIQUE AHAMED
    वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -
    1
    विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत
-
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. ​जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ​पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. ​पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ​पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. ​जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ​पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. ​पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. ​पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोला: विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिकांना फटका, पाण्याची टंचाई तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
    1
    अकोला:
विदर्भात सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून, अकोला जिल्ह्यात आज ४५°C तापमानाची नोंद झाली आहे. हंगामातील हे उच्चांकी तापमान असून वाढत्या उन्हामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच सुरू होणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, दुपारच्या वेळी जिल्ह्यासह ग्रामीण भागात जणू 'संचारबंदी' असल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
दुपारच्या वेळी 'कर्फ्यू' सदृश शांतता
वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अकोला जिल्ह्यासह ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते आणि बाजारपेठा दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र आहे. एरवी गजबजलेल्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
उन्हाची ही लाट पाहता आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा (Heat stroke) धोका वाढला असून, पुरेसे पाणी पिणे, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरणे आणि थंड ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिकांना फटका, पाण्याची टंचाई
तीव्र उन्हाचा परिणाम केवळ मानवावरच नाही, तर शेतीवरही होत आहे. तापमानातील या वाढीमुळे फळबागा आणि उन्हाळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावल्याने पाणी टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे.
येत्या काही दिवसांत तापमानाचा हा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, अकोलेकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.
    1
    संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ​"संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"
    1
    ​"संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.