Shuru
Apke Nagar Ki App…
विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत - विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -
SURYA MARATHI NEWS
विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत - विवाहीतेचा हुंड्यासाठी छळ आणि खुन ; गुन्हा दाखल ; पती अटकेत -
More news from Akola and nearby areas
- Post by Ashish ingle1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1
- ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.1
- Post by Santosh Dhakulkar2
- Post by Sharad Dayedar1
- वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Amravati News Update1
- तमिळनाडू फटाके कारखाना स्फोट : १९ कामगारांचा मृत्यू, ६ जखमी विरुधुनगर (तमिळनाडू), १९ एप्रिल २०२६ : रविवारी दुपारी तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी (Kattanarpatti) येथे वानजा फायरवर्क्स (Vanaja Fireworks) या फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ ते १९ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, ६ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. काही कामगार अजून ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटना कशी घडली? दुपारी सुमारे ३ वाजता कारखान्यात ‘फॅन्सी’ फटाक्यांच्या माळा तयार करत असताना हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की, जमीन हादरली आणि स्फोटाचे लोळ चार युनिट्सपर्यंत पसरले. कारखान्यात सुमारे ३० कामगार काम करत होते. स्फोटानंतर संपूर्ण परिसर धुराने भरून गेला आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मालक कोण? हा कारखाना मुथुमणिक्कम (Muthumanickam) यांच्या मालकीचा आहे. तो वैध परवान्याने चालवला जात होता, असे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे. मात्र, सुरक्षा नियमांचे पालन झाले का, याचा तपास करण्यात येत आहे. बचावकार्य आणि उपचार अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्रतिक्रिया तमिळनाडू मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी घटनेची दखल घेतली असून, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. पार्श्वभूमी विरुधुनगर हा तमिळनाडूचा फटाके उत्पादनाचा प्रमुख जिल्हा आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप वारंवार होतात. अधिक अपडेट्स येत राहतील... मृतांचा आकडा वाढू शकतो, कारण बचावकार्य अद्याप सुरू आहे.1