"हप्ता घेतात अन माल पकडतात" — लातूरमध्ये अधिकाऱ्यांवर हॉटेल चालकाचा संताप; व्हिडिओ व्हायरल प्रतिनिधी D.M लातूर — शहरात कथित हप्ता प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल चालकाने "हप्ता घेतात आणि माझा मालही पकडतात" असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी अचानक रेडसाठी आल्यावर हॉटेल चालकाने संतप्त प्रतिक्रिया दिली. "हप्ता घेतला जातो, आणि तरीही रेड टाकली जाते" असा आरोप करत चालकाने अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचेही दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे. जर व्हिडिओतील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
"हप्ता घेतात अन माल पकडतात" — लातूरमध्ये अधिकाऱ्यांवर हॉटेल चालकाचा संताप; व्हिडिओ व्हायरल प्रतिनिधी D.M लातूर — शहरात कथित हप्ता प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल चालकाने "हप्ता घेतात आणि माझा मालही पकडतात" असा संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना जाब विचारल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही अधिकारी अचानक रेडसाठी आल्यावर हॉटेल चालकाने संतप्त प्रतिक्रिया दिली. "हप्ता घेतला जातो, आणि तरीही रेड टाकली जाते" असा आरोप करत चालकाने अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेल्याचेही दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे. जर व्हिडिओतील आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे.
- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.1
- प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- शेतकऱ्यांचा संताप उफाळला ढोल-ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक; ‘मुक्काम ठोको’ आंदोलन सुरू1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी महिलांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आत्मनिर्भरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. उमरपाटा येथील ‘एकता महिला उत्पादक समूहा’च्या महिलांनी मशरूम शेतीतून आर्थिक स्वावलंबन मिळवत ‘मशरूम क्रांती’ घडवून आणली आहे.1
- वरवंट बकालमध्ये महिला कंडक्टरची अरेरावी; प्रवाशांशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल*.1
- सिल्लोड : भवन येथे मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या संदर्भात शासन दरबारी ईमेल पाठवून जास्तीत जास्त आपल्या भावना पोहोचवण्याकरिता...1
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1