Shuru
Apke Nagar Ki App…
कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
Mansoor Shaikh
कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कृषिमंत्र्यांच्या हस्ते कृषी यंत्र यंत्रसामग्रीच वितरण....मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मारला छोट्या पॉवर टिलर वरून फेरफटका1
- कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत. कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी सोहळा परतीच्या प्रवासात मोठ्या उत्साहात स्वागत लोणंद शहरात पंढरपूर ते आळंदी परतीच्या प्रवासात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दोन ऑगस्ट रोजी साडेतीन वाजता लोणंद निरा रोडवर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर दर्शनासाठी काही काळ थांबला होता यावेळी महिला पुरुष आभाळवृद्ध ग्रामस्थ सोलापूर पोलीस व सातारा पोलीस यंत्रणेने लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही1
- राशीन ग्रामपंचायतसमोरील आंदोलन अखेर संपले; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे1
- राशीनमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण; गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. * राशिन वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 14 76 व 14 77 मधील मोजणी झाल्यानंतरअतिक्रमण हटविण्यात यावे , ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे यांची बदली रद्द करण्यात यावी , सिद्धार्थ नगर दलित वस्ती ( जुना बैल बाजार तळ ) कोणत्या निकषाद्वारे दलित वस्ती म्हणून घोषित केली याची चौकशी व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राशीन शहराध्यक्ष नितीन साळवे , प्रा. विजयकुमार साळवे , तक्रारदार योगेंद्र सांगळे , सचिन आढाव , वंचित बहुजन आघाडीचे भारत साळवे , शहराध्यक्ष दादा आढाव , जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे , यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे दत्तात्रय सोनवणे विजय आढाव , गणेश डाडर , यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी दयानंद आढाव , विनोद आढाव यांच्या सह ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते . यांच्या सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनी नितीन साहेबराव साळवे व इतर आंदोलन कर्त्यांना राशीन ग्रामपंचायत मालकिच्या गट क्र. १४७६ व १४७७ चे अतिक्रमण काढणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक जमीन 2026 / प्र .क्र .20/जमीन दिनांक 25 मार्च 2029. उपोषण बाबतचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले असून निवेदनाचे अवलोकन करता आपणास खाली नमूद केलेप्रमाणे सविस्तर लेखी खुलासा करणेत येत आहे. १. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतूदीनूसार शासकिय जमीनीवरील दिनांक १/१/२०११ पर्यंतचे निवासी अतिक्रमणा बाबत प्रकरणी उक्त संदर्भ क्रमांक ०१ अन्वये उचीत कार्यवाही करणे बाबत ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रकरणी सदरची बाब ही सध्या न्यायप्रविष्ठ असून मा.न्यायालयीन निकालाचे अधिन राहून कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात येत आहे . तसेच कापरे आर. ए. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत राशीन ता. कर्जत यांनी दिनांक २९/७/२०२६ रोजी दिलेल्या लेखीनूसार, उपोषणकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे उदयापासून राशीन ग्रामपंचायतीला कामकाज करणेची अडचण निर्माण होत आहे, तरी माझी नियमानूसार बदली करणेत यावी असा लेखी अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला असून सदरचे अर्जावर नियमानूसार पुढील नियमोचित कार्यवाही करणे बाबत वरिष्ठ कार्यालयास संबंधिताचा बदली होणेबाबतचा अर्ज सादर करण्यात आलेला आहे.अदयाप आदेश या कार्यालयास प्राप्त नाही. तसेच सिध्दार्थ नगर दलित वस्ती (जुना बैलाबाजार तळ) कोणत्या निकषाव्दारे घोषीत केले व तेथे असलेल्या अनुसूचीत जाती-जमाती यांच्या लोकसंख्येची निकषानुसार पुन्हा चौकशी व्हावी व त्या लोकसंख्येची यादी मिळणेबाबत नमूद केलेले आहे तथापि या कामी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करून संयुक्त चौकशी समिती संदर्भीय आदेशानुसार 21 दिवसात अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले .त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले . * चौकट - अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये ग्रामसचिवालय व्यापार संकुल उभरण्यात यावे . आठवडे बाजारसाठी कट्टे तयार करण्यात यावे . स्वच्छतागृह करण्यात यावे . अशी मागणी आरपीआयचे शहराध्यक्ष नितीन साळवे यांनी केली .1
- माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात वाऱ्याचा रौद्ररूप! दुचाकीही पुढे जाईना, पर्यटकांची तारांबळ | Malshej Ghat Winds माळशेज घाटात प्रचंड वाऱ्याचा वेग वाढलाय... हा वेग इतका आहे की दुचाकीसुद्धा पुढेही जाऊ शकत नाही... जिथे दुचाकीही पुढे जाऊ शकत नाही तेथे पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील मोठे कष्ट करावे लागतायंत.. Strong winds have created dangerous conditions at Malshej Ghat, making travel extremely difficult for tourists and commuters. The wind speed has become so intense that even two-wheelers are struggling to move forward. Pedestrians are also finding it difficult to walk due to the powerful gusts. The combination of heavy winds and monsoon weather has made the ghat stretch risky, prompting authorities to advise visitors to remain cautious. Watch this report for ground visuals and the latest weather updates from Malshej Ghat. watch full video.1
- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नगरसेविका आरती शेंडगे यांनी आयोजित केलेल्या पूजापाठ कार्यक्रमासाठी शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार उपस्थित होत्या1
- बाबुराव नगरच्या रस्त्यांची दुरवस्था; ग्रामपंचायतीवर मोर्चाचा इशारा 15 ते 20 हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीकडून दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बाबुराव नगर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, बंदिस्त गटार योजनेतील बिघाड आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, प्रश्न तातडीने न सोडवल्यास ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच नितीन बोऱ्हाडे यांनी दिला आहे. बाबुराव नगरमध्ये सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या वास्तव्यास असून, या परिसरातून सर्वाधिक कर वसूल केला जातो. मात्र त्यानुसार मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप बोऱ्हाडे यांनी केला. परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बंदिस्त गटार योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असला तरी ती सध्या नादुरुस्त अवस्थेत असून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यांवरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अनेकांना किरकोळ दुखापती झाल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. "नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला जातो, मात्र त्याच्या बदल्यात आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत. रस्ते आणि गटारांची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांचा भव्य मोर्चा ग्रामपंचायतीवर काढण्यात येईल," असा इशारा नितीन बोऱ्हाडे यांनी दिला. दरम्यान, या संदर्भात उपसरपंच संजय शिंदे यांनी ग्रामपंचायतीची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, बाबुराव नगरातील बंदिस्त गटार योजनेचा पाइप अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे दाबला गेल्याने गटार लाईन चोकअप झाली आहे. त्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊ लागले. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गेल्या चार दिवसांपासून अहोरात्र काम सुरू असून, ब्रेकरच्या सहाय्याने रस्ता फोडून सुमारे 150 फूट नवीन गटार लाईन मोकळी करण्यात आली आहे. उद्यापासून नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून पुढील दोन दिवसांत गटार योजनेचे काम पूर्ण होईल, असा दावा शिंदे यांनी केला. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची जाणीव ग्रामपंचायतीला असून, समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.2