Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात एक भव्य महामोर्चा निघाला. हजारोच्या संख्येने समाज बांधव, शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि नगरसेवक या महामोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून निघाला. आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या महामोर्चातून आपली भूमिका बजावली.
Sunil Gawali
लातूर शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात एक भव्य महामोर्चा निघाला. हजारोच्या संख्येने समाज बांधव, शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि नगरसेवक या महामोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून निघाला. आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या महामोर्चातून आपली भूमिका बजावली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लातूर शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात एक भव्य महामोर्चा निघाला. हजारोच्या संख्येने समाज बांधव, शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, आणि नगरसेवक या महामोर्चात सहभागी झाले. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून निघाला. आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या महामोर्चातून आपली भूमिका बजावली.1
- NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.1
- लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.1
- आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी 59 जातीमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून राज्यभर राबविण्यात येत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) ने उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासाठी लढा उभा करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून या लढ्याची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित तिव्र निदर्शने आंदोलनात करण्यात आले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनु-जमतीमधील 59 जातीच्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू केले होते. परंतु अनु-जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी संघटीत शक्तीचे विभाजन करून 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून राज्यभर करण्यात येत असल्याचा आरोप रिपाइं ने केला आहे. आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातींना मिळालेले हक्क आबाधित ठेवण्यासाठी व अनु-जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून राज्यभर लढा उभा करण्याची घोषणा यावेळी राजू जोगदंड यांनी केली. यावेळी किसन तांगडे, शाहू डोळस, बापू पवार, अविनाश जोगदंड, महेश आठवले, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, शोभाताई गलांडे, शेख भाभी, अनिता तुरुकमारे, संभाजी गायकवाड, सुभाष तांगडे, अमोल धन्वे, ज्ञानोबा माने, अरुण कांबळे, रवि माने, रामेश्वर मराठे, सतिष शिनगारे, भिमराव घोडेराव, विशाल मिसळे, भाऊसाहेब कांबळे, विलास जोगदंड, महेंद्र वडमारे, भैय्या मस्के, पप्पू वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, नामदेव वाघमारे, धम्मा पारवेकर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अप्पा मिसळे, अक्षय कोकाटे, राजू वक्ते, राहुल कांबळे, देवानंद वाघमारे, अप्पा शेळके, भास्कर जावळे, रतन वाघमारे, विशाल गव्हाणे, भैय्या वाघमारे, विशाल इंगोले, अजित सावंत, नवनाथ डोळस, अप्पा पवार, सुशील तांगडे, मनोज बोराडे, अड. सुरेश वडमारे, संजय हानवते, कुमार अरुण, सोनू वडमारे, दिपक कांबळे, शाम वीर, सनी जोगदंड, के.के.कांबळे, गौतम कांबळे, यांच्यासह शेकडो रिपाइं कार्यकर्ते तिव्र निदर्शने आंदोलनात सामिल झाले होते.4
- महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत देगलूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या प्रांगणात २३ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान पशुपालकांसाठी तीन दिवसांची तांत्रिक कार्यशाळा संपन्न झाली. नांदेड जिल्ह्याचे दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यशाळेत देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव आणि कंधार या पाच तालुक्यांतील ९१६ पशुपालकांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागातील युवक, महिला व शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वावलंबी बनवणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून अधिक उत्पन्न मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत शेळीपालन, दुग्धव्यवसाय, आधुनिक पशुपालन व्यवस्था, संतुलित आहार, रोगप्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, प्रजनन व्यवस्थापन, आर्थिक नियोजन आणि शासकीय अनुदान योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. आर. व्ही. सुरेवाड, डॉ. गौतम खिल्लारे, डॉ. रोहित धुमाळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाशमवार आणि उदगीर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आर. व्ही. सुरेवाड व डॉ. सुरेश पाशमवार यांच्या हस्ते पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.2
- काँग्रेस प्रभारी रेहाना रियाज चिस्ती यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली.1