Shuru
Apke Nagar Ki App…
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
फोटो क्राईम न्यूज
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडक इशारा दिला आहे.1
- लातूरमध्ये 'लातूर पॅटर्न'वर झालेल्या टीकेला आणि बदनामीच्या प्रयत्नांना गुणवत्तेच्या जोरावर चोख प्रत्युत्तर देत श्री विद्या आराधना अकॅडमीचा भव्य गुणवंत गौरव सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील थोरेमोटे लान्स येथे आयोजित या सोहळ्यात रि-नीट २०२६ आणि जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोपटे, रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास ३००० विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे व्यवस्थापन आणि शिक्षकांना दिले, तर पालकांनी संस्थेच्या शिस्तबद्ध व दर्जेदार शिक्षण पद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पत्रकार बंधूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या प्रवासावर प्रकाश टाकताना अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही अकॅडमी केवळ व्यवसायासाठी नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहे. यंदाच्या कठीण परिस्थितीतही अकॅडमीचे ३२५ विद्यार्थी एमबीबीएससाठी, तर २५० ते ३०० विद्यार्थी नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणार आहेत. अकॅडमीत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम निकालाची हमी देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संचालक संजय लड्डा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. यशासोबतच नीतिमत्ता जोपासण्याचा सल्ला देत त्यांनी लातूर पॅटर्नची बदनामी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. गुणवत्तेच्या जोरावर लातूरचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.1
- तब्बल महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी पूर्ण केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठूरायाला निरोप देऊन भाविकांना आपापल्या गावी परतण्याची ओढ लागते. पंढरपूरहून आपल्या गावाकडे परतणाऱ्या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात मनसेच्या वतीने अन्नछत्र चालवले जात आहे.1
- शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे.1
- परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.1
- बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून होत असलेल्या कथित अन्यायकारक वागणुकीचा, मानसिक व शारीरिक पिळवणुकीचा निषेध करण्यासाठी तीव्र निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान आश्रमशाळेतील संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे. तसेच, संस्थाचालकांची कथित पाठराखण करणाऱ्या बीड येथील सहाय्यक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, आश्रमशाळांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणीही करण्यात येत आहे. हे आंदोलन "तुम्ही आम्ही बीडकर" यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.4
- लातूरमध्ये 'माझं लातूर परिवार' आणि रुद्राक्ष ट्रॅव्हल्सच्या वतीने आयोजित मोफत पंढरपूर वारी उपक्रमाच्या ६ व्या वर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील यशवंतराव चव्हाण संकुल येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ३०१ भाविक वारकरी ६ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. याप्रसंगी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते वाहनांची पूजा करून वारकऱ्यांना रवाना करण्यात आले. या मोफत पंढरपूर वारी उपक्रमात प्रामुख्याने पानगाव, भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील आणि शहरातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय अगदी मोफत करण्यात आली होती. या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सक्रिय सदस्य तथा रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे संचालक सोमनाथ मेदगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.4
- कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.3