बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून होत असलेल्या कथित अन्यायकारक वागणुकीचा, मानसिक व शारीरिक पिळवणुकीचा निषेध करण्यासाठी तीव्र निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान आश्रमशाळेतील संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे. तसेच, संस्थाचालकांची कथित पाठराखण करणाऱ्या बीड येथील सहाय्यक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, आश्रमशाळांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणीही करण्यात येत आहे. हे आंदोलन "तुम्ही आम्ही बीडकर" यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून होत असलेल्या कथित अन्यायकारक वागणुकीचा, मानसिक व शारीरिक
पिळवणुकीचा निषेध करण्यासाठी तीव्र निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान आश्रमशाळेतील संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे. तसेच, संस्थाचालकांची कथित पाठराखण करणाऱ्या बीड येथील सहाय्यक इतर
मागास बहुजन कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, आश्रमशाळांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची
जोरदार मागणीही करण्यात येत आहे. हे आंदोलन "तुम्ही आम्ही बीडकर" यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
- आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी 59 जातीमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र राज्यकर्त्यांकडून राज्यभर राबविण्यात येत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) ने उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यासाठी लढा उभा करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून या लढ्याची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरुन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित तिव्र निदर्शने आंदोलनात करण्यात आले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनु-जमतीमधील 59 जातीच्या समाज बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण लागू केले होते. परंतु अनु-जातीच्या आरक्षणामध्ये अबकड उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर ठेवून आपल्या राजकीय फायद्यासाठी संघटीत शक्तीचे विभाजन करून 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून राज्यभर करण्यात येत असल्याचा आरोप रिपाइं ने केला आहे. आरक्षणाच्या माध्यमातून 59 जातींना मिळालेले हक्क आबाधित ठेवण्यासाठी व अनु-जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याची प्रक्रिया रद्द करण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून राज्यभर लढा उभा करण्याची घोषणा यावेळी राजू जोगदंड यांनी केली. यावेळी किसन तांगडे, शाहू डोळस, बापू पवार, अविनाश जोगदंड, महेश आठवले, मायाताई मिसळे, रेश्माताई जोगदंड, शोभाताई गलांडे, शेख भाभी, अनिता तुरुकमारे, संभाजी गायकवाड, सुभाष तांगडे, अमोल धन्वे, ज्ञानोबा माने, अरुण कांबळे, रवि माने, रामेश्वर मराठे, सतिष शिनगारे, भिमराव घोडेराव, विशाल मिसळे, भाऊसाहेब कांबळे, विलास जोगदंड, महेंद्र वडमारे, भैय्या मस्के, पप्पू वाघमारे, भाऊसाहेब कांबळे, नामदेव वाघमारे, धम्मा पारवेकर, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अप्पा मिसळे, अक्षय कोकाटे, राजू वक्ते, राहुल कांबळे, देवानंद वाघमारे, अप्पा शेळके, भास्कर जावळे, रतन वाघमारे, विशाल गव्हाणे, भैय्या वाघमारे, विशाल इंगोले, अजित सावंत, नवनाथ डोळस, अप्पा पवार, सुशील तांगडे, मनोज बोराडे, अड. सुरेश वडमारे, संजय हानवते, कुमार अरुण, सोनू वडमारे, दिपक कांबळे, शाम वीर, सनी जोगदंड, के.के.कांबळे, गौतम कांबळे, यांच्यासह शेकडो रिपाइं कार्यकर्ते तिव्र निदर्शने आंदोलनात सामिल झाले होते.4
- परभणी महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. वाढीव अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी परभणी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य शासनाने या मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १० ऑगस्टपासून कामबंद आंदोलन छेडण्याचा थेट इशारा संघटनेने दिला आहे.1
- कर्जतमध्ये मेंढपाळांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी कर्जतमधून थेट इशारा दिला आहे.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथील विवेकानंद सेवा केंद्र शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचा उत्साहात जागर करण्यात आला.1
- आता या देशावर 'इंग्रज तरी बरे होते' असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे. साप्ताहिक समृद्ध कर्जतचे राशीन प्रतिनिधी जावेद काझी यांनी हे वृत्त दिले आहे.1
- बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज, सोमवार दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आश्रमशाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर संस्थाचालकांकडून होत असलेल्या कथित अन्यायकारक वागणुकीचा, मानसिक व शारीरिक पिळवणुकीचा निषेध करण्यासाठी तीव्र निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान आश्रमशाळेतील संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई करण्याची प्रमुख मागणी केली जात आहे. तसेच, संस्थाचालकांची कथित पाठराखण करणाऱ्या बीड येथील सहाय्यक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याशिवाय, आश्रमशाळांमध्ये सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय त्रुटींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणीही करण्यात येत आहे. हे आंदोलन "तुम्ही आम्ही बीडकर" यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.4
- कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.3