Shuru
Apke Nagar Ki App…
पैठण गोदावरी नदी पत्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपासा पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील वाळू घाटाच्या टेंडरच्या नावाखाली वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महसूल आणि स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण या संगनमताने माफियांनी महिना भरातून आतापर्यंत जवळपास तब्बल १ लाख ब्रासपेक्षा अधिक अवैध वाळू उपसा करून शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. तसेच वाळू पाट्यात वाळूच्या कारणाने दररोज वादविवाद हाणामाऱ्या सारखे घटना घडत आहें तरीपण स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन लक्ष देईना. मग एखांद्याचा जीव गेल्यावर कारवाई केली जाणार तर नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया वाळू पट्यातील त्रस्त झालेले गावकरी करु लागले आहेंत.
शुरु रिपोर्टर
पैठण गोदावरी नदी पत्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपासा पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील वाळू घाटाच्या टेंडरच्या नावाखाली वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महसूल आणि स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण या संगनमताने माफियांनी महिना भरातून आतापर्यंत जवळपास तब्बल १ लाख ब्रासपेक्षा अधिक अवैध वाळू उपसा करून शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. तसेच वाळू पाट्यात वाळूच्या कारणाने दररोज वादविवाद हाणामाऱ्या सारखे घटना घडत आहें तरीपण स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासन लक्ष देईना. मग एखांद्याचा जीव गेल्यावर कारवाई केली जाणार तर नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया वाळू पट्यातील त्रस्त झालेले गावकरी करु लागले आहेंत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार मुंबई.राज्यात धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारले जाणार आहेत. या अभिनव उपक्रमामुळे बालपणापासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार मुलांमध्ये रुजण्यास मदत होईल.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात विहिरीची मोटर दुरुस्त करताना वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धानोरा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.1
- विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना लग्नाच्या मंडपाला आग; कंडारी येथे लग्नाच्या मंडपाला आग; विजेच्या तारांवर अडकून घडली थरारक घटना कंडारी येथे भर लग्नसमारंभात थरारक घटना घडली. जोरदार वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडून वरच्या विद्युत तारांवर अडकला. यानंतर शॉर्टसर्किट होऊन मंडपाला भीषण आग लागली. ही घटना नांदुरा तालुक्यातील कंडारी गावात घडली असून, भर उन्हाळ्यातील बदलत्या हवामानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला. तसेच मंडपाखाली उभ्या असलेल्या काही दुचाक्यांनाही आग लागून त्या जळाल्या. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बदलत्या हवामानामुळे लग्नसराईत अशा घटनांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.1
- महसूल पथकाला हुलकावणी देत माटरगावयेथे ट्रॅक्टरसह चालक फरार शासकीय वाहनालाच अडवून जीवघेणा पाठलाग, चालकावर गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर मंडळातील माटरगाव शिवारात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडला. तरीही चालकाने चलाखीने ट्रॅक्टर पळवला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या - प्रकरणी सुलतानपूर मंडळ अधिकारी अनुना कावळे यांनी खुलताबाद ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण गायकवाड (रा. सुलतानपूर वर गुन्हा दाखल झाला. मंडळ अधिकारी कावळे यांना ८ मे रोजी फुलमस्ता नदीपात्रातून काही जण अवैधरित्या वाळूचे उत्खनन, वाहतूक करत असल्याचे सांगण्यात आले. ९ मे पहाटे महसूल पथक कारवाईसाठी रवाना झाले.तपासणी सुरू असताना तेथे दुधाची गाडी आली. त्या वाहनाला रस्ता देण्याच्या बहाण्याने चालकाने ट्रॅक्टर बाजूला घेतल्याचे भासवत सुलतानपूरच्या दिशेने धूम ठोकली. पथकाने पाठलाग केला. मात्र ट्रॅक्टरने ओव्हरटेक करू दिले नाही.पथकात अनुना कावळे, शेख मोयुनोदिन, सविता वाहटुळे होते. यावेळी ट्रॅक्टर चालकाने माझ्याकडे परवाना नाही. काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.4
- औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. हा तालुक्यात अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- महाराष्ट्रातील शेगावातील श्री गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल वापरण्यावर सक्त बंदी घालण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्या भाविकांचा मोबाईल जप्त करण्यात येईल, असे संस्थानने स्पष्ट केले आहे.1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1