बुलढाणा/परिवहन मंत्र्यांच्या 'मोफत सुविधा' घोषणेवर प्रश्नचिन्ह; एसटीचा प्रयोग ठरणार का फसवा?* परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."
बुलढाणा/परिवहन मंत्र्यांच्या 'मोफत सुविधा' घोषणेवर प्रश्नचिन्ह; एसटीचा प्रयोग ठरणार का फसवा?* परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला नवीन निर्णय आणि त्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया. एसटी महामंडळाने १० टक्के प्रवास भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो थेट प्रवाशांवर लादला गेला आहे. यासोबतच काही सुविधांची घोषणाही करण्यात आली आहे."मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घोषणेनुसार, येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे (शौचालय) मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, त्यांची दर चार तासांनी साफसफाई करणे आणि बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या सुविधांच्या बदल्यात प्रवाशांवर १० टक्के भाडेवाढ लादण्यात आली आहे, ज्याचा तीव्र विरोध होताना दिसत आहे." भाडेवाढीचे धोरण चुकीचे आहे. जर शासनाला प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करायचे असेल, तर त्यांनी आधी दर्जेदार सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. आज भाडेवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साहजिकच खाजगी वाहतुकीकडे (खाजगी बसेस किंवा ट्रॅव्हल्स) वळतील. एक प्रकारे, शासनच खाजगी वाहतुकीला प्रोत्साहन देत आहे, असे वाटते."स्थानकांवरील सुविधांबद्दल बोलताना एका प्रवाशाने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, सध्याच्या नियमांनुसार शौचालयासाठी २ रुपये आणि आंघोळीसाठी ३ रुपये असे शासनाचे दर आहेत. तरीही, अनेक ठिकाणी सर्रास १० ते १५ रुपये वसूल केले जातातथोडक्यात सांगायचे तर, प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण आहे. कागदावरच्या या योजना वास्तवात कशा उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल."1
- वरवट बकाल बस स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! महिला कंडक्टरची मुजोरी; "कलेक्टर-होम मिनिस्टर असला तरी फरक पडत नाही."1
- ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६: करवंडचे बावन्न बुरुज व राजवाड्याला महायुती सरकारच्या माध्यमातून पुनर्वैभव प्राप्त करून देऊ, मंत्रीमहोदय मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचा निर्धार. ऐतिहासिक_करवंड_महोत्सव२०२६ शिवकालीनइतिहास छत्रपतीशिवाजीमहाराज महाराणीगुणवंताबाई शिवविवाहसोहळा. करवंड महोत्सव २०२६ करवंड परिसरातील ५२ बुरुज व ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुत्थान करून संपूर्ण भूमीला नव्याने ऐतिहासिक ओळख देण्याचा संकल्प मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.1
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- दरेगाव हादरले! जंगलात सापडला इंदेवाडीच्या व्यक्तीचा मृतदेह दरेगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून जंगलात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख कैलास पवार (रा. इंदेवाडी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना जंगलात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात मृत्यू संशयास्पद असल्याचे दिसून येत असून हा खून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृतदेह जंगलात टाकण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे दरेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालन्यात खून, मृतदेह टाकला दरेगावच्या जंगलात, कैलास पवार (इंदेवाडी) असे मयताचे नाव1
- *मेहकर:समृद्धी महामार्गावर रील बनवण्याच्या वेडापायी एका दीड वर्षाच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय... मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या मेहकर जवळील फरदापुर च्या चोल नाक्यावर समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233” हा क्रमांकाची ट्रॅव्हल्स चा अपघात झाला ट्रॅव्हल बस ही पलटी होऊन घासत दुसऱ्या कार ला धडकली यामध्ये ती कार देखील चकना चुर झाली झाली या खाजगी बसच्या चालकाने आणि वाहकाने चालत्या गाडीत मोबाईलवर रील बनवण्याचा स्टंट केला... याच नादात बुलढाण्यातील मेहकर टोल नाक्यावर बसचा भीषण अपघात झालाय.... या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून रुग्णालयात वेळेवर डॉक्टर न मिळाल्यानं नातेवाईकांनी मोठा संताप व्यक्त केलाय मेहकरजवळील फरदापुर येथे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ MH 29 BE 3233 हा क्रमांक त्या अपघातग्रस्त लक्झरी बसचा वाहन क्रमांक आहे.19 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6 वाजता एक बंजारा एक्सप्रेस नावाची लक्झरी बस पलटी झाली. या अपघातात एका लहान बाळाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना मेहकर येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक आणि त्याचे सहकारी गाण्यावर व्हिडिओ (रील) तयार करत होते, त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. बसने वळण्याचा प्रयत्न करताना ती समोरून येणाऱ्या चारचाकीवर पलटी झाली. अपघातानंतर चालक व त्याचे सहकारी घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आणि ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळी पोहोचले. टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे—चालकाच्या केबिनमध्ये नियमबाह्य पद्धतीने 6–7 प्रवासी बसवले होते. यामुळे सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी आरटीओच्या दुर्लक्षावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासन खाजगी बसला आळा घालेल का असा प्रश्न उपस्थित झाला1