Shuru
Apke Nagar Ki App…
ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा भाग म्हणून अहिल्यानगरमधील पारनेर येथील राळेगण सिद्धी येथे त्यांनी मौन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन केले आहे.
जनतेचा आवाज 24x7
ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा भाग म्हणून अहिल्यानगरमधील पारनेर येथील राळेगण सिद्धी येथे त्यांनी मौन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.1
- नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- संकनपूरी येथे ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत थेट सरपंचासोबत चर्चा केली आहे.1
- अकोले तालुक्यातील रनद बु येथे श्रीरामपूर भरारी पथकाने मोठी कारवाई करत ४ लाख ९५ हजार रुपयांचा बेकायदेशीर दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही भरारी पथकाची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईदरम्यान बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपीवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.1
- pcmc प्रभाग 13 निगडी ओटास्कीम खड्डे बुजावताना खडी रॅबिट च वापर1
- विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ अहमदनगर जिल्ह्यातील राशीनमध्ये बंद पाळण्यात आला असून निषेध फेरी काढण्यात आली आहे. आंदोलकांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यासाठीच राशीन शहरात बंद पुकारत ही निषेध फेरी काढण्यात आली आहे.1
- ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचा भाग म्हणून अहिल्यानगरमधील पारनेर येथील राळेगण सिद्धी येथे त्यांनी मौन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन केले आहे.1
- रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी या व्हिडिओद्वारे केला आहे.1