Shuru
Apke Nagar Ki App…
शिवणी जाट येथील क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय दिग्गजांची चौफेर फटकेबाजी
Raghunath Aghao
शिवणी जाट येथील क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी राजकीय दिग्गजांची चौफेर फटकेबाजी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Raghunath Aghao1
- मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.1
- कृषी उत्पन्न बाजार समितीचा निष्काळजीपणा लाखो रुपये खर्च करून पियाजाल बनवलेले आहे त्याच्या पाठीमागे संडासचे सांडपाणी खुल्या बाजारात सोडण्यात आले यामुळे नागरिकांचीआणी शेतकऱ्यांची आरोग्यांची चिंता वाढली1
- रिसोड: चिमुकल्यांनी मिरवणुकी द्वारे शिवछत्रपतींना मानवंदना दिली .............................................. ज्ञानेशप्रसाद ब्युरो चिफ वाशिम जिल्हा वाशिम: रिसोड येथील चिमुकल्यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अकरा वाजता शिवछत्रपतींचे जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने शहरातील पालखी मार्गाने अतिशय उत्साहात डोक्यावर खुर्ची घेऊन त्या खुर्चीमध्ये शिवछत्रपतींची प्रतिमा अतिशय दिमाखात स्थापन करून हार अर्पण अगरबत्तीच्या सुगंध दरवळत संपूर्ण शहरातून शिवछत्रपतींना मानवंदना वाहत वाहत जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवप्रभूंच्या जय घोषाने आकाश दुमदुमून गेले होते. बालकांचा उत्साह पाहून घरातील महिला मंडळी गणपती मिरवणुकीप्रमाणे या बालकांनी काढलेले ही शिवजन्मोत्सव मिरवणूक पाहून आश्चर्यचकित होऊन डोक्यावर खुर्चीत विराजमान असलेल्या शिवछत्रपतींचे दर्शन घेतल्याशिवाय राहवले नाही. व त्याच्या एक तासानंतर मित्र परिवारातील दुसऱ्या गटाने चार चाकी गाडीवर श्री शिवछत्रपतींचा पुतळा विराजमान करून ढोल ताशांच्या गजरांमध्ये भगवा झेंडा फडकवत पुन्हा एक शिवछत्र प्रभुंची मिरवणूक काढली अशा रीतीने या शाळकरी मुलांनी शिवछत्रपती प्रति आपली सद्भावना व्यक्त करून हिंदवी स्वराज्य निर्माता छत्रपतींना मानवंदना वाहिली व आपली त्यांच्याप्रती असलेली भक्ती भाव प्रकट केला तदनंतर, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे या चिमुकल्यांनी या मिरवणुकीची सांगता केली.1
- औंढा हद्दीत अवैध अफू लागवडीवर पोलिसांची धडक कारवाई; दहा क्विंटलहून अधिक झाडे जप्त1
- *बुलढाण्यात शिवविचारांचा जागर! ऐतिहासिक पाळणा सोहळ्याने वेधले सर्वांचे लक्ष.*1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- बुलडाणा:: नाचून नव्हे, वाचून साजरी करा शिवजयंती!”; बुलढाणा शहरात भव्य पदयात्रेचा उत्साह.*1