विकृत मानसिकतेविरोधात हिंदू समाज आक्रमक; टॉवर चौकात पुतळा दहन करत व्यक्त केला जनआक्रोश खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
विकृत मानसिकतेविरोधात हिंदू समाज आक्रमक; टॉवर चौकात पुतळा दहन करत व्यक्त केला जनआक्रोश खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.
- खामगाव: केंद्र सरकारमार्फत प्रस्तावित असलेल्या भारत-अमेरिका व्यापार करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज खामगाव येथे काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, हा करार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.प्रस्तावित करारांतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यास अमेरिकेतील अनुदानित आणि उच्च उत्पादकता असलेली उत्पादने भारतीय बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक शेतमालाचे भाव कोसळून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. या कराराचा जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचा सविस्तर 'इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट' तयार करावा,शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस संरक्षणात्मक उपाययोजना सुचवून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा,हमीभाव आणि बाजार समिती व्यवस्था मोडीत निघू नये, यासाठी विशेष शिफारसी कराव्यात यावा.दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या ग्रामीण व्यवसायांना संरक्षण देण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, देशातील पीक पद्धतीचे संतुलन बिघडवणारा आणि जैवविविधतेवर परिणाम करणारा हा करार रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत. या मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- उद्या भेंडवळमध्ये घट मांडणी; वर्षभराच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष अक्षय तृतीया निमित्त पारंपरिक सोहळा; पावसाचा आणि शेतीचा अंदाज जाहीर होणार भेंडवळ, जि. बुलढाणा | प्रतिनिधी विदर्भातील बहुचर्चित आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या भेंडवळ येथील घट मांडणी सोहळा उद्या अक्षय तृतीया निमित्त पार पडणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या विधीतून येणाऱ्या वर्षातील पाऊस, शेती, अर्थकारण आणि सामाजिक स्थितीचा अंदाज वर्तवला जातो. परंपरेची शेकडो वर्षांची परंपरा भेंडवळ गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही घट मांडणी केली जाते. विशेष पद्धतीने मातीचा घट (माठ) ठेवून त्याभोवती विविध वस्तूंची मांडणी केली जाते. या मांडणीतील बदल, स्थिती आणि चिन्हांवरून जाणकार मंडळी वर्षभराचा अंदाज मांडतात. पावसाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष दरवर्षीप्रमाणे यंदाही घटातील पाण्याची पातळी, धान्याची स्थिती आणि इतर संकेत यावरून पावसाचे प्रमाण कसे राहील? याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे. विशेषतः शेतकरी वर्गासाठी ही भविष्यवाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रशासनाच्या वतीने देखील आवश्यक तयारी करण्यात आली आहे. स्थानिकांचे मत > “भेंडवळची घट मांडणी ही आमची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही याकडे आशेने पाहतो. पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिशा ठरवतो.” श्रद्धा आणि परंपरेचा संगम भेंडवळची घट मांडणी ही वैज्ञानिक दृष्टिकोन नसली तरी श्रद्धा, अनुभव आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. आजही हजारो लोक या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात.1
- वरवट बकाल बस स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! महिला कंडक्टरची मुजोरी; "कलेक्टर-होम मिनिस्टर असला तरी फरक पडत नाही."1
- अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या "ऑपरेशन प्रहार" अंतर्गत अवैध व प्रतिबंधित खरा निर्मिती आणि गुटखा विक्री विरोधात माना पोलिसांनी कारवाई केली आहे.या कारवाईत कुरुम येथे प्रतिबंधित खर्रा निर्मिती व गुटखा, पान मसाला विक्रीबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने कारवाई केली असता १) अजहर शहा जफर शहा (वय ३९ वर्षे), २) आनंद भगवान सावळे (वय २९ वर्षे) व ३) इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय २८ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून खर्रा बनविण्याची विद्युत मशीन किंमत र 25 हजार रुपये इतर खर्रा, सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल 76 हजार 383 रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार 383 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकोला पोलीस दलामार्फत नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरुद्ध अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असून नागरिकांनीही अशा प्रकारची माहिती पोलीस प्रशासनास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वैशाली मुळे यांच्या यांचे मार्गदर्शनाखाली माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनि. गणेश महाजन, पो.हे.कॉ. उमेश हरमकर, मंगेश घाटे, पंकज वाघमारे, आकाश काळे, यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी द्वारकादास सोळंके यांनी केली.1
- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी महिलांबाबत अत्यंत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी असा गंभीर आरोप केला होता की, काही महिला पैशांसाठी किंवा अन्य कारणांसाठी स्वतःहून बलात्कार करून घेतात. त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशा महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.सुबोध सावजी यांच्या या विधानानंतर बुलढाण्यातील शिवसेना आणि महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाली आहे. खामगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी धाव घेतली असून, सावजी यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर दोन दिवसांच्या आत सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर शिवसेना स्वतःहून कारवाई करेल. यामध्ये त्यांना काळे फासणे आणि मारहाण करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.आंदोलकांनी असे म्हटले आहे की, सुबोध सावजी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांनाही आई-बहिणी आहेत, तरीही त्यांनी असा खालच्या स्तराचा आरोप केला, जो समस्त महिलांचा अपमान करणारा आहे. या गोष्टीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि त्यांना लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत आहे.1
- १४ गावांची तहान भागवणाऱ्या गावातच पाणी टंचाई..! अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावातून १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो, आज त्याच गावात पाण्यासाठी हाहाकार उडाला असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. या भीषण टंचाईचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अभ्यासाच्या वेळी कडक उन्हात या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. "शिक्षण सोडून पाणी भरण्याची वेळ आमच्या मुलांवर का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोहारा येथील मन नदीवर कवठा गावात प्रशासनाने कोटी रुपये खर्चून धरण बांधले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या धरणात पाणीच अडवण्यात आलेले नाही. त्यामुळे हा खर्च केवळ शोभेसाठी केला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धरणात पाणी नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली असून विहिरींनी तळ गाठला आहे. महागडे पाणी: जगायचे कसे? सध्या उन्हाळ्याचे दिवस असून हाताला काम नाही. अशा परिस्थितीत २०० लिटर पाण्यासाठी गरिबांना २०० रुपये मोजावे लागत आहेत. "पैसे देऊन पाणी विकत घ्यायचे की घरात अन्न आणायचे?" अशा विवंचनेत येथील मजूर आणि गरीब वर्ग अडकला आहे. रामभरोसे कारभार लोहारा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या अत्यंत विस्कळीत झाला असून, कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुस्त असल्याने जनतेचे हाल होत आहेत. अकोला जिल्हाधिकारी महोदयांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन लोहारा येथील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.2
- प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर.. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर... सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्पिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर शेती साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- खामगाव : येथील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणांच्या विरोधात प्रखर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन कोणत्याही सरकारविरोधी नसून, समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनींवरील अवैध अतिक्रमणे (लँड जिहाद) यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्ये थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा,अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.पुतळा दहन करून समाजात निर्माण झालेला जनआक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या.1